वेदोक्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संस्कृत ही देव भाषा असल्याचा वैदिक व द्रविड संस्कृतीतील समज आहे.

वेद हे हिंदू धर्माचे आधारस्तंभ आहेत. ऋषिमुनींच्या नावे वेदांतील ऋचा येतात. पण ते काही त्या ऋचांचे रचनाकार नसतात. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. त्यामुळे ही दैवीवाणी असल्याचे समजले जाते. आणि म्हणून ती अनुसरण्याची मुभा फक्त द्विजांना असल्याचे मानण्यात येते.

ज्यांचा दुसरा जन्म झाला त्यांना द्विज म्हणले जाते. मौंजीबंधनानंतर (मुंज) दुसरा जन्म झाल्याचे समजतात. हा मुंज करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना आहे असे मानतात. म्हणून या ती वर्णांना द्विज वर्ण म्हणतात.

मंत्रांचे प्रकार २ आहेत.

१)वेदोक्त मंत्र. २)पुराणोक्त मंत्र.

लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती यांच्या संबंधात कडवटपणा आला त्यासाठी कारणीभूत झाले ते वेदोक्त प्रकरण! वेदोक्त प्रकरणाचे विवेचन करताना या घटनांचे साक्षीदार खुद्द बाळाचार्य खुपेरकर तसेच ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. या प्रकरणाची विस्तृत चर्चा ग. रं. भिडे यांनीही केली आहे. वेदोक्त प्रकरणाचा टिळकांशी संबंध कसा, बघूया.

वेदोक्त प्रकरणाबद्दल अभ्यासकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. शाहू महाराजांच्या बहुतांश चरित्रकारांनी असेच लिहिले आहे की, महाराज कार्तिक स्नानासाठी नदीवर गेले, तेव्हा ब्राह्मणाने त्यांच्यावर वेदोक्त मंत्रपूर्वक संस्कार करण्यास नकार दिला. “क्षुद्राला मंत्र सांगताना अंघोळ कशाला करावी लागते,” असेही म्हणाला. हा भटजी वेदोक्त मंत्र नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत आहे, हे तिथे उपस्थित असलेल्या राजारामशास्त्री भागवत यांनी महाराजांच्या लक्षात आणून दिले. बाळाचार्य खुपेरकर मात्र वेगळाच घटनाक्रम सांगतात. छत्रपतींच्या पदरात जी सोळा शास्त्री घराणी होती, यांच्यापैकी एका घराण्यात बाळाचार्य खुपेरकर यांचा जन्म झाला होता. वेदोक्ताच्या वेळी त्यांचे वय २२-२३ वर्षांचे असावे. ते लिहितात, “शाहू महाराजांचे कार्तिकस्नान या वादाच्या वेळी नव्या राजवाड्यावरच होत असे. स्नानासाठी ते पंचगंगा नदीवर गेले होते वगैरे सर्वच खोटे आहे. ज्या ब्राह्मणाने ‘क्षुद्राला मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला पाहिजे?’ हे सांगितले ते चूकच होते.” अगदी प्रकरणाच्या मुळापासूनच मतभेदांना सुरुवात होते.

बाळाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी महाराजांचे कार्तिक स्नान व्हायचे होते, त्या पहाटे राजवाड्यावरून भटजींच्या घरी त्यांना नेण्यासाठी गाडी गेली. भटजी घरात नव्हता. बायकोने उत्तर दिले, त्यावरून भटजी कोठे असेल याची कल्पना गाडीवानाला आली आणि त्याने भटजीला गाठले. रात्रभर त्यांची अंघोळ राहिली असेल म्हणून गाडीवान भटजीच्या घराकडे गाडी नेऊ लागला, तोच भटजीचा तोल सुटला आणि म्हणाला, “क्षुद्राला पुराणोक्त मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला लागते?” हुजऱ्याने महाराजांना ही गोष्ट येऊन सांगितली. महाराजांनी भटजीला चाबकाने फोडून काढले. त्याला शिक्षा केली. महाराजांच्या तेव्हा लक्षात आले की, आपल्या घरात काही विधी वेदोक्त, तर काही पुराणोक्त पद्धतीने सांगितले जातात.

महाराजांचे बरोबरच होते, असे सांगून बाळाचार्य खुपरेकर लिहितात, “ब्राह्मणांनी आपले चारित्र्य निर्मळ ठेवलेच पाहिजे, धर्मकृत्य करणाऱ्यांनी तर निष्कलंकच राहिले पाहिजे. राजोपाध्यांना हे कळल्यावर त्यांनी त्या भटजीची नेमणूक लगेचच रद्द केली. पुढे कोल्हापूरच्या इतर ब्राह्मणांनी ज्या भटजीने महाराजांच्या हुजऱ्याला उलट उत्तर दिले, त्याची निंदाच केली आहे.” खुपेरकर सांगतात, “महाराजांबरोबर भटजीने वाद घातला वगैरे लिहितात ते सर्व खोटे. महाराजांसमोर वाह्यातपणे बोलण्याची कुणाचीही ताकद नव्हती. दस्तुरखुद्द छत्रपतींसमोर वेडेवाकडे बोलण्याची एका सामान्य भटभिक्षुकाची हिंमत झाली असेल का? ज्याने त्याने विचार करावा!”

महाराजांच्या घराण्यात पूर्वीपासूनच काही विधी वेदोक्त, तर काही पुराणोक्त पद्धतीने होत असत. मध्यंतरीच्या काळात वेदोक्त विधी बंद पडले होते. झाल्या प्रकारानंतर १९0१ साली पुन्हा एकदा आपले सर्व विधी वेदोक्त पद्धतीने व्हावे, असे शाहू छत्रपतींना वाटले आणि मुख्य राजोपाध्यांना विधी सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. राजोपाध्ये यांनी महाराजांना सविस्तर पत्र लिहिले. त्यात म्हटले, “शास्त्राप्रमाणे बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील, याबद्दल विचारविनिमय करावा लागेल आणि त्यासाठी मी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो.” यानंतर राजोपाध्ये मुंबईला गेले. कारण, त्यांना एलएलबीची परीक्षा द्यायची होती.

राजोपाध्यांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्याला कधीही विरोध केला नाही, याचे पुरावे आहेत. य. दि. फडके यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकांनी मात्र याबद्दल आपल्या ग्रंथात स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. य. दि. यांच्या म्हणण्याप्रमाणे, अप्पासाहेब राजोपाध्ये शाहू छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास अनुकूल नव्हते. राजोपाध्येंनी महाराजांच्या खासगी कारभाऱ्याला लिहिलेल्या पत्रात असे स्पष्ट म्हटले आहे -

“१. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारची इच्छा असल्यास माझी हरकत नाही.

२. एखादी वहिवाट बंद झाल्याची पुन्हा सुरू शास्त्राचा नियम आणविण्याची पद्धत आहे. ती या बाबतीत सोडून देऊन एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा आरंभ केला गेला. यामुळे हे प्रकरण या थरावर आले आहे, हे माझे दुर्दैव आहे. मी जर शास्त्राचा निर्णय मागविला असता तर काही एक विघ्न किंवा अडचण न येता वेदोक्त कर्मास केव्हाच आरंभ करता आला असता.” आता राजोपाध्येंचे म्हणणे खरे मानायचे की फडकेंचे तर्क? तुम्हीच ठरवा.

महाराज स्वतः गायत्री मंत्र म्हणत, त्यांना ‘श्रावणी’ करण्याचा अधिकार होता, (‘श्रावणी’ म्हणजे नवे यज्ञोपावित धारण करणे) बाळाचार्य खुपरेकर लिहितात, “महाराज ‘श्रावणी’ करीत. मी त्यांच्या समोरच्या रांगेत पाच-सहा फुटांवर बसत असे. वेदोक्ताचा अधिकार असलेलेच ‘श्रावणी’ करतात. काही वेदोक्त विधी पूर्वीच्या छत्रपतींनी बंद केले होते. ते पुन्हा सुरू करण्याबद्दलचा हा वाद होता. महाराजांच्या क्षत्रियत्वाबद्दलचा नव्हता. त्यांच्या वेदोक्ताच्या अधिकाराबद्दलचा नव्हता.” चिरोलच्या पुस्तकातसुद्धा काही काहीसे विधी (at certain religious ceremonies) असाच उल्लेख आहे, सगळे नाही. मधल्या काळात ४0 वर्षे महाराजांच्या घराण्यात वेदोक्ताचा संस्कार लोप पावला होता. तो तेवढा प्रायश्चित्त घ्या आणि पुन्हा सुरू करा, असे राजोपाध्यांचे म्हणणे होते.

इतरांची मते घेण्याच्या आधीच राजोपाध्यांना मात्र त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात आले! राजोपाध्येंनी वेदोक्त विधी करण्यास नकार दिला होता का? मध्यंतरीच्या काळात कुणीतरी महाराजांचे याबद्दल कान भरले असावेत! दरम्यानच्या काळात महाराज लंडनला गेले आणि भास्करराव जाधव यांनी महाराजांच्या अपरोक्ष कोल्हापुरातील ब्राह्मणांची वतने, त्यांच्या जमिनी जप्त केल्या, त्यांच्या दक्षिणा बंद केल्या, सुमारे एक हजार ब्राह्मणांची उत्पन्ने जप्त केली आणि यामुळे वाद आणखीन वाढला व न्यायालयापर्यंत गेला. तोवर याबद्दल टिळकांनी जाहीरपणे या वादाबद्दल काहीही लिहिलेले नाही.

शाहू महाराजांप्रमाणे इतर सर्व मराठ्यांना वेदोक्ताचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी खासेराव जाधव आणि इतर सत्यशोधकांनी सुरू केलेली होती आणि हे टिळकांच्या कानावर आल्यानंतर टिळकांनी यावर लेखन सुरू केले. टिळक लिहितात, “कोल्हापूरच्या संस्थानचे अधिपती राजा या नात्याने आपणाकडे असलेल्या धर्माच्या बाबतीत तिऱ्हाईतपणाचा अधिकार विसरून जाऊन जेव्हा एका विविक्षित ज्ञातीचे पुरस्कर्ते बनतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या खुळास पाठबळ देऊन परधर्मी सार्वभौम राजाकडे आपल्या संस्थानातील प्रजेस धाव घेण्यास लावतात तेव्हा या संबंधाने दोन शब्द लिहिणे जरूर होते.”

एका लेखात तर टिळकांनी स्पष्टच लिहिले आहे, “मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे. त्यांचा हात धरणारा या काळात कुणीही राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणाने तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही. निरनिराळ्या ज्ञातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हांस पाहणे आहे व तसा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहिले आहेत.”

वेदोक्त प्रकरण, लोकमान्य आणि छत्रपती शाहू महाराज[संपादन]

कोल्हापूरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दीत सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने स्वतः अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले, यावरून वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. राजोपाध्याय स्वतः आजारी असल्याने ते तिथे हजर नव्हते, या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केली. जाणाकारांनी शाहू महाराजांच्या लक्षात ही गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने "छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!" पण छत्रपती शाहू महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरहि तो ब्राह्मण ऐकेना, त्यातून त्याने स्वतः शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापूरच्या ब्राह्मणांनीही या मूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. संस्थानचे रेव्हेन्यू अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला.

स्वतः शाहू राजांना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरूपाची समाजरचना मान्य होती का नाही? त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते. कोल्हापूरच्या ’विद्याविलास’च्या संपादकांना लिहिलेले हे पत्र :

"माझ्या मतासंबंधी बराच गैरसमज करण्यात येत आहे, म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरता पाठवत आहे. सत्यशोधक, समाजिस्टांचा हल्ला माझेवर का? ज्याप्रमाणे ख्रिस्ती, बौद्ध, थिऑसफी इ. पंथांची काही तत्त्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाचीही काही तत्त्वे मला मान्य आहेत. मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही. हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता, मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून जातो तसा येईन असे सांगितले. मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते? मला वेद मान्य असून, मी वेदांस चिकटून रहाणारा आहे, असे असता माझ्यावर हल्ला का?

कळावे,

शाहू छत्रपती

मुंबई, ता. २३ मार्च २/१९२१

लोकमान्य टिळक विरुद्ध चिरोल[संपादन]

चिरोलच्या ’दि अनरेस्ट इन इंडिया’ या लोकमान्यांवर आणि चित्पावन ब्राह्मणांविरुद्ध लिहिलेल्या पुस्तकाचे मराठी भाषांतर भास्करराव जाधव व अण्णासाहेब लठ्ठे व प्रो. म. गो. डोंगरे या तिघांनी केले व ते पुस्तक स्वखर्चाने छापून शाहूमहाराजांनी फुकट वाटले. महाराजांनी सर व्हलेंटाईन चिरोलला पुस्तकाच्या लेखनासाठी दरबारी पाहुणा म्हणून ठेवून घेतले. कागदपत्र परवले, पैसा दिला. महाराजांचे ॠण चिरोलने स्वतः प्रस्तावनेतच मान्य केले आहे. मंडालेहून आल्यावर टिळकांनी चिरोलवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. या खटल्यात भास्करराव जाधव आणि डोंगरे चिरोल साहेबाचे साक्षिदार म्हणून उभे राहिले. शाहु महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी विरोध केला असे चिरोलने म्हंटले होते त्यासंदर्भात टिळकांच्या वकिलांनी १९०१ ते १९०८ या काळातले केसरीचे अंक समोर ठेवून प्रश्न केला की "टिळकांनी शाहुमहाराजांच्या वेदोक्ताच्या अधिकाराला कोठे विरोध केला ते दाखवा." कारण या ब्राह्मण द्वेषाने प्रेरित झालेल्यांनी तसा लेखी व तोंडि प्रचार केला होता. तेव्हा या दोघांनीही टिळकांनी वेदोक्ताच्या संबंधात लोकमान्यांनी शाहूमहाराजांना कधिही विरोध केला नाही हे कबूल केले. डोंगरे म्हणाले वेदोक्त "प्रकरणात व्यक्तीश: छत्रपतिंविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखब्वता येणार नाही. किंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहेच असे टिळक म्हणत होते असे मला वाटते."

याच खटल्या मधे सत्यशोधक भास्कररवांची जी साक्ष झाली ती अशी. जाधव म्हणाले , "मला या वेदोक्तामधे काहिहि अर्थ दिसत नाही ब्राह्मण विरोधी जातात म्हणून आम्ही हा हक्क मागतो. हिंदुंनाच काय पण मुसलमान ख्रिस्ती यांनाहि हा अधिकार असावा असे मला वाटते!" तेव्हा वकिलांनी प्रश्न केला कि मग तुमच्या मागणीप्रमाणे मुसलमान व ख्रिश्चनांनिही वेदोक्ताची मागणी केली असेल. त्यावर जाधवांनी उत्तर दिले. अद्याप त्यांनी ती मागणी केली नाही. जाधवांनी हे प्रकरण कसे रंगवले असेल याचा अंदाज करता येईल.

भास्करराव जाधव यांची कार्यशैली[संपादन]

राजोपाध्ये यांची भूमिका मांडणारे पत्र पुढे देतो पण हे सविस्तर पत्र ५ मे १९०२ला पाठवले त्यावर दुसऱ्याच दिवशी महाराजांच्या खाजगी कारभाऱ्याचे उत्तर आले व त्यात राजोपाध्यांना बडतर्फ केले गेले. व जप्तीचा हूकूम दिला. १३ मेला शाहू लंडनला निघाले व १५ मेला मुंबईला बोटित बसले. त्यांच्या पाठीमागे सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी राजोपाध्ये यांची उत्पन्ने जप्त केली पण ती केवळ उपाध्येपणाशी संबंधित न करता खाजगी मालकिची उत्पन्नेसुद्धा जप्त केली . एवढेच नव्हे तर या वादाशी संबंध नसलेल्या छोट्या गावातील शेकडो ब्राह्मणांनाच्या लहानसहान जमिनी जप्त करून त्यांना देशॊधडिला लावले. ही सर्व उत्पन्ने मंदिरांची व्यवस्था लावण्यास पूर्वापार या मंडळिंना दान म्हणून मिळाली होती ही सर्व ब्राह्मण परागंदा होऊन ब्रिटिश हद्दीत निघून गेली. मूळ प्रश्न होता केवळ क्षत्रियत्वाचे संस्कार लोप पावल्याने छत्रपतींनी प्रायश्चित्त घेण्याचा होता. त्यांचे क्षत्रियत्व ब्राह्मण समाजाला मान्यच होते. जाधवांनी खुनशिपणाने राजोपाध्येंवर जप्तीचा हुकूम बजावण्याची वेळ राजोपाध्यांच्या मुलाच्या लग्नघडीलाच काढली. या सत्यशोधक जाधव यांनी ६ मे १९१९ला एक व्याख्यान दिले त्यात कुणबई वैदिक वर्ग निर्माण करु नये असे उद्गार काढले. वेदपठ्ण करण्यातच पुरुषार्थ नाही असे म्हटलाने वेदाभिमानी असल्याने छत्रपति शाहू संतापले मग जाधवांनाच सपशेल माफी मागावी लागली.[ संदर्भ हवा ]

टिळकांची भूमिका[संपादन]

शाहु छत्रपतीं प्रकरणाचा फायदा घेऊन सत्यशोधकांनी ब्राह्मण -क्षत्रिय समाज सोडून सर्वच हिंदु समाजाला,- परधर्मियांनाहि- वेदोक्ताचा अधिकार मिळाव म्हणून प्रचार करत होती.[ संदर्भ हवा ]यासंबंधि टिळकांनी लिहिलेले शब्द, " जातिभेद हा हिंदु समाजाच्य हाडी खिळलेला आहे. .... हे परंपरागत किंबहुना रचनासंगत भेदाभेद अजीबात सोडून टाकून सर्व हिंदुस्थानातील जातींचा सबगोलंकार करणे इष्ट असले तरी शेकडो वर्षे ते शक्य नाही हे कोणासहि मान्य केले पाहिजे व आम्ही आजच्या प्रश्नांचा जो विचार करणार आहोत तो याच धोरणावर करणार आहोत. समाजाच्या स्थितीत जो काही पालट कोणास करावयाचा असेल तो व्यवस्थेने बेताबेतानेच केला पाहिजे व तोही असा असला पाहिजे कि त्याची उपयुक्तता लोकांच्या चटकन लक्षात येईल. हल्ली जी वेदोक्ताची चळवळ सुरू झाली आहे ती त्या प्रकारची नाही...मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे त्यांचा हात धरणारा या काळात कोणी राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणानेच तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही.... निरनिराळ्या जातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हास पाहणे आहे व तशा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहीले आहेत."(नेमके कुठे आणि केव्हा लिहीले.[ संदर्भ हवा ]

वेदोक्ता बाबत टिळकांचे जाहीर मत[संपादन]

५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात " कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारून आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."

लोकमान्य टिळक यांना विद्धंसक सुधारक होण्यापेक्षा विधायक सुधारणावादी व्हावेसे वाटत होते हे स्वच्छ दिसते. आधी याजकिय स्वातंत्र का आधी सामाजिक सुधारणा हा वाद प्रसिद्ध आहेच. पण या प्रकरणात त्यांची अकारण बदनामी केली गेली.[ संदर्भ हवा ]

टिळक विधायक सुधारणावादी होते. जातीभेद मोडणे त्यांना इष्ट ही वाटत होते पण क्रमाक्रमने. खुद्द शाहु राजांनी तंजावर प्रकरणात मराठा समाजातील भोसले, घोरपडे,पवार ,जाधव आदि केवळ १२ मराठा घराण्यांतच वेदोक्ताचा अधिकार आहे असे सांगीतले म्हणजे खुद्द छत्रपतींनीही सर्व मराठा समाज किंवा सर्व ब्राह्मणेतरांना वेदोक्ताचा अधिकार आहे किंवा हवा असे १९१७ पर्यंत म्हटले नव्हते..[ संदर्भ हवा ]

सयाजी महाराजांची भूमिका[संपादन]

सयाजीराव महराजांनी या प्रकरणात विधायक भूमिका घेऊन हा वाद कोल्हापूरप्रमाणे बडोदे संस्थानात माजू दिला नाही. त्यांनी १८९६ला एका [ संदर्भ हवा ]पत्रात म्हंटले आहे की "मला पुराणोक्त आणि वेदोक्त यात स्वतःला काही कमी जास्त श्रेष्ठ वाटत नाही. मात्र सामाजिक दृष्ट्या वेदोक्त श्रेष्ठ पद्धत मानली जाते. पण अशा रितीने लोक केवळ विधी आणि कर्मे यातच बुडुन धर्माची तत्त्वे विसरून गेली आहेत ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून मी सुधारणा हाती घेतली आहे."

राजोपाध्यांची भूमिका[संपादन]

शाहु महाराजांना अंघोळ न करता पूजा सांगू पहाणाऱ्या मूर्ख ब्राह्मणाला शासन केल्यावर जे मुख्य राजोपाध्ये त्यांना दरबारातर्फे काही विचारणा झाली.त्यात त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याची आपली इच्छा आहे किंवा कसे असे विचारले गेले ते पत्र किंवा यादी ७ - १० - १९०१ चे आहे.

यावर राजोपाध्ये ते मुंबईला एका परिक्षेसाठी निघाले होते त्यांनी राजांची समक्ष भेट घेऊन परत आल्यावर शास्त्राप्रमाणे विचार करण्यासाठी बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील याच्या विचारविनिमयासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो असे सांगीतले . छत्रपती शाहू राजांची मान्यता मिळाल्यावर ते मुंबाईला निघून गेले. शंकराचार्य ,काशी ,वाई इ, स्वखर्चाने घेऊन येतो असे राजोपाध्ये यांनी राजांना लेखी कळवले होते. त्यास मूक संमती मिळाली. राजोपाध्ये परतल्यानंतर मधल्या ८-१० दिवसात कोणीतरी शाहू राजांचे कान भरले व राजोपाध्यांना काशी आदीहून शास्त्री लोकांना आणण्यास मनाई करण्यात आली. वर उल्लेखलेले पत्र ही राजोपाध्यांना ७-१० ऐवजी १ महिना १० दिवस एवढे उशीरा म्हणजे १८-११-१९०१ला मिळाले..[ संदर्भ हवा ]

५- मे १९०२ला राजोपाध्ये यांनी महाराजांना पाठवलेल्या पत्राचा सारांश,[संपादन]

१. रा.ब.दिवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाही. आपण वस्तुस्थिती सोडून कळवले हे माझे दुर्दैव आहे. .... २.सरकरवाड्यातील हव्यकव्य कृत्ये वेदोक्त वा पुराणोक्त करायचे काम माझे नाही तर सरकारास जे विधि असतात ते सरकार नसताना मी करायचे असतात.विशेष प्रसंगी सरकार असताना मी फक्त त्यांचे सन्निध असावे एवढेच माझे काम आहे.पद्धत कोणतीही असो. ३. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारांची इच्छा आसल्यास तसे करण्यास माझि काहीही हरकत नाही. ४.मला नेहमीच्या वहिवाटिप्रमाणे सूचना मिळाली नाही म्हणून मी हजर झालो नाही. नेहमीप्रमाणेच सूचना मिळताच मी हजर झालो हि.यावरून असे दिसेल कि मी उपाध्यायाचे काम सोडलेले नाही. ५. काशी,नाशिक इ.क्षेत्रांकडून निर्णय आणवले पाहिजेत त्यास हुजुरांची मान्यता पाहिजे. ६.शास्त्राची अनुज्ञा आणल्याशिवाय हे काम केले( संस्कार लोप पावल्याने प्रायश्चित्त करून पुन्हा वेदोक्त पद्धत सुरू करण्यासंबंधि) तर माझेब्वर येथील ब्रह्मवृंदाचा बहिष्कार पडेल. मजवर बहिष्कार पडल्यास माझी हरकत नाही पण मीच बहिष्ख्रुत झालो तर धार्मिक विधी करणार कोण? ७. १५ मेला माझ्या मुलाचे लग्न बावड्याचे जहागिरदार यांचे मुलीशी ठरले आहे. ते झाले की मी शास्त्राच्या निर्णय मिळवण्याच्या उद्योगाला लागतो, व तसा निर्णय मिळवून मी जुलै १९०२ चेआत उत्तर देतो. एखादी वहिवाट बंद पडली कि नव्याने सुरू करताना शास्त्राचा निर्णय आणवण्याव्चा पूर्वापार चालत आलेला सामान्य नियम आहे. तो या बाबत सोडून एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक कृत्ये करण्याचा प्रारंभ केला गे;ला यामुळे हे प्रकरण या थरावर आले हे माझे दुर्दैव आहे. ८. सरकरांच्या परंपरागत उपाध्येपणावरून मला दूर का करण्यात येऊ नये असा प्रश्न प्रस्तुत यादित मला विचारला आहे. या प्रश्नाला सध्या एवढेच उत्तर देतो कि शास्त्राज्ञेस व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटिस अनुसरून मी आपले काम करण्यास सिद्ध आहे तोपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नाहि.

पण यावर लगेच ६ मेला तुमचे उत्तर समाधनकारक नाही असे उत्तर आले व लगेच जप्तीचा हूकुम काढला जाउण राजोपाध्येंना काढून टाकण्यात आले.व जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरून काढला असा खोटाच आरोप केला गेला. वास्तविक राजोपाद्ये यांनी उत्तर दिले त्यात हुजुरांचे घराणे क्षत्रिय का शूद्र याचा प्रश्नच उद्भवत नाही असे लिहिले होते.

मधे ३०-३५ वर्षांच्या काळात अज्ञान छत्रपतिंच्या मुंजीही झाल्या नव्हत्या. कारण सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यात होता. पण स्वतः शाहु महाराज छत्रपती झाल्यावर याच राजोपाध्यांनी शाहूंना गायत्री मंत्र दिला होता. आणि हे स्वतः महाराजांनीच एका हुकुमात मान्य केले होते. पुढे महाराज श्रावणीही करत असत. जो श्रावणी करतो त्याला वेदोक्ताचाही अधिकार असतोच असतो हे जो धर्मशास्त्र जाणतो त्यालाच कळेल. महाराजांसाठीचे सर्व श्रावणीचे विधी स्वतः राजोपाध्येच करत. या श्रावण्या जुन्या राजवाड्यात भवानी देवीसमोर होत व १६ कायदेकरी म्हणजे धर्मपंडीतहि आपल्या श्रावण्या महाराजांच्या उपस्थितीतच करत.

याचा अर्थच असा होता कि , राजोपाध्ये व अन्य पंडीतांना राजांच्या क्षत्रीयत्वाची किंवा वेदोक्ताच्या अधिकाराची कधीही शंका नव्हती. मधल्या काळात ४० वर्षे संस्कार लोप पावला होता. तो प्रायश्चित्ताशिवाय सुरू करणे हे अशास्त्रीय एवढेच राजोपाध्ये व अन्य ब्रह्मवृंदाचे म्हणणे होते. आणि शास्त्राला ते धरुनच होते.

१९१२ला तंजावरच्या वारसा हक्काबद्दल वाद निघाला असता शाहू राजांनी अर्ज केला. एकूण २४ हक्कदार होते. या खटल्यात खालच्या कोर्टाने तंजावर वंश हा धर्मशास्त्र दृष्ट्या संस्कार न केला गेल्याने (लग्न ,मुंज सारखे) शूद्र ठरवला व धर्मशास्त्र दृष्ट्या धर्मपत्नी नसलेल्या व्यक्तीचा अधिकार मान्य केला. यावर शाहु राजांनी अपील केले व आपल्या घरात कित्येक वर्षे वेदोक्त विधी बंद होते म्हणून आपणही शूद्र आहोत असा मुद्द्दा मांडला. मद्रास हायकोर्टातून निकाल आला. कोल्हापुरचे वेदोक्त प्रकरणही हायकोर्टात निघाले.. ब्राह्मण ज्या पद्धतीने विधी करतात तोच महाराजांना हवा होता. शककर्त्या शिवरायांचाही तसा आग्रह नव्हता. क्षत्रियांस उचित असे विधी गागाभट्टांनी ठरवले त्या प्रमाणे विधी होत. त्यास व प्रायश्चित्तास कोल्हापुरचे महाराज तयार होते तर वाद तेव्हाच मिटला असता .

"तेव्हा क्षत्रिय संभाळणे हे मुख्यत: यजमानांच्याच हाती आहे.कोल्हापुरच्या महाराजांनी त्यात चूक करून पुन्हा उपाध्यायाला आपल्या म्हणण्याप्रमाणे वाकवण्यासाठी कामावरून काढून टाकले व जप्ती आणण्याचा अन्याय केला " असा अप्रत्यक्ष शेरा मद्रासच्या हायकोर्टाने मारला. शिवरायांप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन वेदोक्त विधी सुरू करावेत काही काळ विधी केले नाहीत म्हणून त्यांचे क्षत्रियत्व रद्द होत नाहि व ते शूद्र ही ठरत नाहीत असे कोर्टाने सूचित केले.

मद्रास हायकोर्टाचा निकाल सुमारे २२५ पानांचा असून तो इंडियन लॉ रिपोर्टरच्या मद्रास्च्या १९२५ च्या vol x L VIII मधे दिलेला आहे. सर्वांत गंमत ही की क्षत्रीयत्वासाठी भांडणाऱ्या महाराजांनी ब्राह्मणांप्रमाणे वेदोक्त विधी सुरू केले. ते अद्याप तसेच चालु आहेत. हायकोर्टात मधे काही काळ मुंजी वगेरे वेदोक्त विधी झाअले नव्हते असे पुराव्यातून निषपन्न झाले त्यामुळे कोल्हापुर घराणे किषत्रिय का शूद्र याचा निर्णय देऊ नये अशी विनंती राजांतर्फे करण्यात आली. तशी नोंद निकालात स्पष्टपणे करण्यात आली आहे. महाराजांच्या मृत्युनंतर धर्मविधींपुरते छत्रपती ब्राह्मण पद्धतीने वेदोक्त करतात व त्यापुरते ते ब्राह्मण झालेत आणि हे त्यांनी सुरू केलेले ब्राह्मण पद्धतीचे विधी मराठा पुरोहित करतात.

१९१८ला युवराजांचे लग्न सयाजीरावांच्या नातीशी ठरले. त्यांनी आवश्यक असलेले प्रायश्चित्त यावे असे सुचवले. ७५ वर्षात कोल्हापुरच्या औरस वारसाचा विवाह होणार तेव्हा परंपरेप्रमाणे पहिले केळवण राजोपाध्ये यांचे व्हायचे. त्याप्रमाणे राजोपाध्येंना राजांचा निरोप गेला. पण राजोपाध्ये यांनी मी आता राजोपाध्ये नसल्याने ते शक्य नाही असे कळवले. तेव्हा राजे स्वतः त्यांना भेटले.शेवटि केळवण ही झाले. रितसर प्रायश्चित्थी राजांनी घेतले. राजोपाध्येंच्या व त्यांच्या मुलाच्या देखरेखीखाली सर्व विधी कोल्हापुर व बडोदे येथे झाआले. १६ कायदेकरी ब्राह्मणांपैकी एकाने आपले जप्त उत्पन्न सोडावे म्हणून अर्ज केला तो मन्य झाला. सर्वांची उत्पन्ने सोडण्याचे मान्य करून छत्रपतींनी आपल्या मनाचा थोरपणा दाखवला. मात्र राजोपाध्ये आणि अन्य ब्राहमणांनी आमची चूक नसता आम्ही अर्ज का करावा अशी भूमिका घेतली व अर्ज केले नाहीत .पुढे महाराजही ही गोष्ट विसरले व कोणाचीही उत्पन्ने सुटली नाहित.

केसरीचा राजोपाध्येंना सल्ला काय होता?[संपादन]

"...कोल्हापुर येथले राजोपाध्ये यांच्या मूळ सनदा कशा आहेत ते आम्हाला बरोबर माहित नाही. - राजोपाध्ये यांना आमची सूचना आहे की महाराज परत आल्यावर त्यांचे पुढे हे प्रकरण पुन्हा मांडावे व निस्पृह रितीने त्यांची समजूत घालण्याची खटपट करावी आणि ते नच जुळले तर हे प्रकरण इंग्रज सरकार कडे न्यावे. दिवाणी किंवा फौजदारि हक्क देणे ही राजांच्या खुषीतील गोष्ट आहे. पण मामुल वहिवाटीप्रमाणे उपाध्येपण करण्यास तयार असता इनाम गाव काढून घेणे महाराजांच्या खुषीतील अधिकारातील गोष्ट नाही."

राजोपाध्ये हे नामदार गोखले यांचे वर्गमित्र असून राजकिय दृष्ट्याही टिळक पक्षिय नव्हते. टिळकांचा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. केवळ जी माहिती उपलब्ध होत्अ असे त्यातून टिळकांनी भूमिका मांडली. त्यात विधायक सुधारक आणि न्यायाची बूज राखणे एवढाच आधार होता.[ संदर्भ हवा ]

इंग्रजांची भूमिका[संपादन]

परंतु राजोपाध्यायांनी टिळकांची सूचना न मनता छत्रपती येण्याअगोदरच राजांनी लंडनला जाण्यापूर्वी नेमलेल्या संस्थानाच्या काळजीवाहू कौन्सिल कडे जप्तीच्या फेरविचारासाठी अर्ज केला. कौन्सिल ने तो फेटाळला. त्यवर राजोपध्ये यांनी तो संस्थानच्याच पोलिटिकल एजंट कडे अपील केले. एजंट ने महाराजंच्य अखत्यारीतला विषय म्हणुन नाकारले. शेवटि राजोपाध्ये यांनी मुंबईच्या गव्हर्नर कडे अर्ज केला. त्यावेळी लॉर्ड नॉर्थकोट हा गव्हर्नर होता. त्याने प्रथम राजोपाध्ये यांच्या बाजूने निकाल दिला. तेवढ्यत शाहु राजे लंडनहून परतले व त्यांनी गव्हर्नरची भेट घेऊन हा निकाल फिरवायला लावला. हा निकाल महाराजांच्य हुषारिमुळे फिरला असे त्यांचे पहिले चरित्रकार कोल्हापुरचे दिवाण लठ्ठे यांनी शाहू मेमॉयर्स भाग १ पृ २०८ वर दिलेल्या टिपात म्हटले आहे.

यानंतर राजोपाध्ये यांनी व्हाइसरोय लॉर्ड कर्झन कडे अर्ज केला. पण २-३ वर्षे फ्रेजरने तो दाबून ठेवला.[ संदर्भ हवा ] . ५-०१-१९०५ला नामदार गोखले यांच्या सांगण्यावरून उपाध्यायंनी पुन्हा अर्ज पाठवला. तेव्हा सर्वच कागदपत्रे मागवली गेली. त्यावर फ्रेजर ने एक टिपण करून पाठवले त्यावरून इंग्रजांनी जातीय वाद वाढवणे , कर्झन विरुद्ध फाळणीविरुद्ध टिळकपक्षीयांनी उठवलेल्य रानाला खीळ घालणे व फॊडा आणि झोड या कुटिल राजकारणाचा डाव खेळणे कसे साध्य केले ते दिसेल..[ संदर्भ हवा ]

या टिपणाच्या सुरुवातीला आलेल्या वाक्यांचा भावार्थ - " मी या केसचा विचार करताना मझे एकेकाळचे पाल्य म्हणून शहू छत्रपतींकडे ओढा असल्याने त्यांचा पक्षपती म्हणून विचार करत आहे हे कबुल करतो."

याच टिपणात फ्रेजर म्हणतो, " सनदेच्या अर्थासंबंधि शंक असेल तर मला वाटत की राजकारणाच्या दृष्टिने आपण यचा विचार केला पहिजे.जर राजोपाध्येला पूर्ण चेचला नाही तर सरकरची इभ्रत जाईल आणि महाराजांचा पराभव होईल." अश प्रकारे हा न्यायाचा प्रश्न न रहाता इभ्रत व राजकारण यंचा प्रश्न झाला. ब्राह्मणद्वेष्ट्या सत्यशोधक आणि फोडा अणि झोड अशा राजकारणपटु इंग्रजांची युती झाली. राजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या प्त्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ या नावाने कही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वतःचा फायदा होतोका ते पहत आहेत. लावालाव्या करून चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहे. राजांविषयी आदर राखुन मी सांगूतो की या ने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे."

"राजोपाध्यायांनी महाराजांना शूद्र म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हटले " असा खोटा प्रचर जाधव व अन्य सत्यशोधकांनी केला. ब्रिटिशांनी टिळक पक्षियांवर सूड उगवण्यासाठी त्यास उचलून धरून ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वादाला खतपाणी घातले. ब्राह्मण वर्गाला अन्य समाजापासून फोडायचे त्यांना राजकारणासफायद्याचे होते. असे असले तरी इंग्रजांना हा वाद जातीय नाही हे महित होते. याबाबत हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने ३ मर्च १९०५ला एक पत्र लिहिले त्याच भावार्थ,

"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रिय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत.आणि ते तसे म्हणत नाहित असे म्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहे. राजोपाध्ये ४ थ्या उताऱ्यात म्हणतात, मराठी राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हापुरचे राजघरणे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे , त्यात कोणताही वाद नाही."

प्रकरणानंतर[संपादन]

[ संदर्भ हवा ] समाजात जातीय गैरसमज पसरवण्याचे कार्य त्यांनी पद्धतशीर पणे केले. आणि शाहू महाराज आणि त्यांच्यबरोबर लोकमान्य टिळकांनाही अकारण या वादात काहीही संबंध नसताना गोवले गेले. मूळ काय आहे हे न वाचताच अद्यापहि या प्रकरणला जातीय द्वेष वाढवण्यासाठी अद्यापही वापर केला जातो..[ संदर्भ हवा ] भले भले लोक याला बळी पडतात तर सामान्यांची काय होत असेल अवस्था?.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]