"रामचंद्र द्विवेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "कवी प्रदीप" हे पान "रामचंद्र द्विवेदी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:


== गाजलेली निवडक गीते ==
== गाजलेली निवडक गीते ==
* आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो ये हिंदुस्तान हमारा है(चित्रपट : किस्मत)
* हम लाएं हैं तूफान से कश्ती निकाल के (चित्रपट: जागृति)
* हम लाएं हैं तूफान से कश्ती निकाल के (चित्रपट: जागृति)
* पिंजडे के पंछी रे, तेरा दर्द न नाने कोय (गायकः प्रदीप)
* पिंजडे के पंछी रे, तेरा दर्द न नाने कोय (नागमणि; गायकः प्रदीप)
* देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (चित्रपट: नास्तिक, गायक: प्रदीप)
* देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायक: प्रदीप)
* दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल (जागृति)
* ऊपर गगन विशाल (मशाल)
* आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झांखी हिंदुस्तान की(जागृति, गायकः प्रदीप)
* मुखडा देख रे प्राणी जरा दर्पन में(दो बहन)
* दूसरों का दुखडा दूर करनेवाले
* हमने जगत की अजब तसवीर देखी





१३:०९, २१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

रामचंद्र द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप (६ फेब्रुवारी, इ.स. १९१५ - ११ डिसेंबर, इ.स. १९९८) हे हिंदी भाषेतील चित्रपटसृष्टीतील गीतलेखक आणि गायक होते.

जीवन

रामचंद्र द्विवेदींचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगर येथे झाला होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणार्‍या बाँबहल्ल्यांमुळे ब्रिटिशांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते[ संदर्भ हवा ].

कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. चिनी आक्रमणानंतर लता मंगेशकरांनी गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले. कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते.

कवी प्रदीप यांनी ए मेरे वतन के लोगो गीताबद्दल मिळणार्‍या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणार्‍या संस्थेला मिळवून दिला [ संदर्भ हवा ].

गाजलेली निवडक गीते

  • आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो ये हिंदुस्तान हमारा है(चित्रपट : किस्मत)
  • हम लाएं हैं तूफान से कश्ती निकाल के (चित्रपट: जागृति)
  • पिंजडे के पंछी रे, तेरा दर्द न नाने कोय (नागमणि; गायकः प्रदीप)
  • देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायक: प्रदीप)
  • दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल (जागृति)
  • ऊपर गगन विशाल (मशाल)
  • आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झांखी हिंदुस्तान की(जागृति, गायकः प्रदीप)
  • मुखडा देख रे प्राणी जरा दर्पन में(दो बहन)
  • दूसरों का दुखडा दूर करनेवाले
  • हमने जगत की अजब तसवीर देखी