"शरद जोशी (शेतकरी नेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११३: ओळ ११३:
* समस्याएँ भारत की
* समस्याएँ भारत की
* स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?
* स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?

==चरित्र==
* शरद जोशी यांचे ‘अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा’ या नावाचे चरित्र [[भानू काळे]] यांनी लिहिले आहे. या चरित्राचे प्रकाशन ५-१२-२०१६ रोजी झाले.


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१४:२१, १० डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

शरद अनंत जोशी (जन्म : सातारा, ३ सप्टेंबर, इ.स. १९३५; मृत्यू : पुणे, १२ डिसेंबर, इ.स. २०१५) हे शेतकर्‍यांचे मराठी नेता होते.

कौटुंबिक माहिती

जन्म : ३ सप्टेंबर १९३५

जन्मस्थान : सातारा

वडील : अनंत नारायण जोशी

आई : इंदिरा अनंत जोशी

पत्‍नी : लीला (१९४३ - १९८२)

कन्या : सौ. श्रेया शहाणे (कॅनडा), डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)

शिक्षण

प्राथमिक : रजपूत विद्यालय, बेळगाव

माध्यमिक : रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)

एस.एस.सी : १९५१

बी..कॉम : १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई

एम.कॉम : १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई

सुवर्णपदक : बँकिंग विषयासाठी सी. रँडी सुवर्णपदक

IPS : IPS (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८

खासदार : राज्यसभेचे सदस्य

व्यवसाय

  • कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
  • भारतीय टपाल सेवा, Class I अधिकारी. १९५८-१९६८. पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.
  • Chief, Informatics Servise, International Bureau, UPU

(Universal Postal Union), Bern, Switzerland 1968-1977

  • शेती व वर्तमानपत्रीय स्तंभलेखन १९७७ पासून आजतागायत संघटना कार्य. उद्दिष्ट : व्यक्तिस्वातंत्र्य शाबूत राखणे आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीतकमी करणे
  • शेतकरी संघटनेची स्थापना (१९७९); ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ
  • १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिके पिकविणार्‍या व दूध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने, वगैरे.
  • देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना (३१ ऑक्टोंबर १९८२)
  • महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यांत शेतकरी आंदोलने; स्त्री प्रश्नांची मांडणी
  • चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
  • स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती
  • शेतकरी महिला आघाडीची स्थापना
  • महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
  • महिलांच्या संपत्ती अधिकाराची फ़ेरमांडणी
  • ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरुषांना आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उतार्‍यांवर नोंदविली गेली.
  • दारूदुकानबंदी आंदोलन
  • पंचायत राज्य बळकाव आंदोलन

संस्थात्मक कार्य (संस्थापक अध्यक्षपद)

  • कृषि-योगक्षेम संशोधन न्यास
  • चाकण शिक्षण मंडळ
  • शिवार अ‍ॅग्रो प्रॉडक्टस लि.
  • भामा कन्स्ट्रक्शन्स लि.

राजकीय कार्य

  • स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
  • देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा
  • स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार (राज्यसभा) (जुलै २००४ ते जुलै २०१०)

विशेष पदनियुक्ती

  • अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१); कॅबिनेट दर्जा. "राष्ट्रीय कृषिनीती " चा मसुदा तयार केला
  • राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून
  • स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य (१९९७)
  • अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१). - कॅबिनेट दर्जा. या काळात जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनीती, विशेषत: कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल बनवला.
  • २००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य

जागतिक स्तरावरील कार्य

  • अमेरिकेतील सेंट लुई येथील जागतिक कृषिमंचाच्या (World Agriculture forum) सल्लागार मंडळाचे १९९९ पासून सदस्यत्व
  • अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी नियमित निमंत्रित.

लिखाण/संपादन

  • शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक
  • ’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे करवून घेतली.
  • द टाइम्स ऑफ इंडिया, बिझिनेस इंडिया, संडे, द हिंदु बिझिनेस लाइन, लोकमत इत्यादी नियतकालिकांमध्ये/दैनिकांमध्ये स्तंभलेखन
  • शेतकरी संघटनेच्या ’शेतकरी संघटक’ या पाक्षिक मुखपत्रासाठी २८ वर्षे व ’आठवड्याच्या ग्यानबा’ या साप्ताहिकासाठी २ वर्षे नियमित लेखन

संशोधन मार्गदर्शन

  • तिसर्‍या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.

ठळक नोंदी ’इंडिया-भारत’

  • १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सरकारने शेतकर्‍यांच्या शोषणाची इंग्रज सरकारची वासाहतिक नीती चालूच ठेवली. त्यामुळे देशाच्या जनतेमध्ये आधी आर्थिक व अनुषंगाने सामाजिक, सांकृतिक व मानसिक दौर्बल्य तयार झाले. हे दौर्बल्य अधोरेखित करणार्‍या ’इंडिया-भारत’ संकल्पनेचे उद्गाते
  • विकसित देशांत शेती चालू राहण्यासाठी शेतकर्‍यांना भरघोस अनुदाने दिली जातात. भारतात मात्र शेतकर्‍यांना उणे अनुदान दिले जाते, हे सप्रमाण सिद्ध केले.

शरद जोशी यांची ग्रंथसंपदा (मराठी)

  • अंगारमळा (महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेले पुस्तक)
  • अन्वयार्थ भाग १ आणि २
  • अर्थ तो सांगतो पुन्हा
  • खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
  • चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
  • जग बदलणारी पुस्तके
  • पोशिंद्याची लोकशाही
  • प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
  • बळीचे राज्य येणार आहे
  • भारतासाठी
  • माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
  • राष्ट्रीय कृषिनीती
  • शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
  • शेतकर्‍याचा राजा शिवाजी आणि इतर लेख
  • स्वातंत्र्य का नासले?

इंग्रजी ग्रंथसंपदा

  • Answering before God
  • Bharat - Eye view
  • Bharat Speaks Out
  • Down To Earth
  • The Women's Question

हिंदी ग्रंथसंपदा

  • समस्याएँ भारत की
  • स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?

चरित्र

  • शरद जोशी यांचे ‘अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा’ या नावाचे चरित्र भानू काळे यांनी लिहिले आहे. या चरित्राचे प्रकाशन ५-१२-२०१६ रोजी झाले.

पुरस्कार

  • Agriculture Today या मासिकातर्फे दिले गेलेले पहिले Agriculture Leadership Award 2008
  • मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार २०११
  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०१० : ’अंगारमळा’ या पुस्तकासाठी
  • सातारा भूषण : रा.ना.गोडबोले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ११वा सातारा भूषण पुरस्कार २०१०