"ल.सि. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: ल.सि. जाधव हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचे बालपण मातंग वस्तीत गेले.... |
(काही फरक नाही)
|
१२:०२, ८ जून २०१५ ची आवृत्ती
ल.सि. जाधव हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचे बालपण मातंग वस्तीत गेले. पुढे ते भारतीय स्टेट बॅंकेत अधिकारी झाले. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात वयाच्या पासष्टीनंतर लेखनाला सुरुवात करून जाधव यांनी होरपळ हे आत्मकथन, पराभूत धर्म व सुभ आणि पीळ या कादंबर्या अशा सरस साहित्यकृती निर्माण केल्यानंतर त्यांनी मावळतीची उन्हे ही प्रस्तुतची अभिनव आणि गुणवत्तापूर्ण कादंबरी लिहिली..
ल,सि, जाधव यांनी लिहिलेली पुस्तके
- पराभूत धर्म (कादंबरी)
- मावळती उन्हे (कादंबरी)
- सं गच्छध्वम (दलित चळवळीतले प्रामाणिक कार्यकर्ते भिकाभाऊ साळवे यांच्या आयुष्यावरची कादंबरी)
- सुंभ आणि पीळ (आत्मकथन)
- होरपळ (आत्मकथन)
ल.सि. जाधव यांना मिळालेले पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा इ.स. २०११-१२ सालचा आत्मचरित्रासाठीचा लक्ष्मीबाई टिळक ्हा एक लाख रुपयांचा पुरस्कार : डॉ. श.रा. राणे यांना ’प्रिय वत्सला’साठी व ल.सि. जाधव यांना ’होरपळ’साठी विभागून
- ’सुंभ आणि पीळ’साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक पुरस्कार (२०१५)