"महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून (इ.स. १९६१पासून) राज...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

२१:५६, १५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून (इ.स. १९६१पासून) राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्‌कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे.

त्यासाठी महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरावर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम जोमाने सादर केले जातात. त्यांतील सर्वांत आगळावेगळा उपक्रम म्हणून या दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेकडे पाहिले जाते. विशेषत: हौशी नाट्य, बालनाट्य, संगीत नाटक, संस्कृत नाटक, हिंदी नाटक व व्यावसायिक नाटके इतक्‍या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही गौरवसंपन्न स्पर्धा आहे.

प्राथमिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रात अनेक (सुमारे २०) केंद्रे असतात.

पूर्वी या स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येत असे. त्या विभागाला या स्पर्धेचे फारसे देणघेणे नव्हते. त्यामुळे बदल करून हल्ली या स्पर्धा सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात येतात.

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा

हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील सहभागातील संख्येमुळे त्या प्राथमिक आणि अंतिम अशा द्विस्तरीय घेतल्या जातात. सांस्कृतिक संचालकाने वेळोवेळी नियमात बदल केले. त्यामुळे कधीकधी स्पर्धेच्या मूळ उद्देशालाच बगल दिली गेली होती. उदाहरणार्थ, नवीन नाट्यसंहिता असली पाहिजे ही अट अनिवार्य करण्यात आली. त्यामुळे जुनी अभिजात नाटके बाद झाली. नवीन नाट्यसंहितेच्या अनुपलब्धतेमुळे स्पर्धकांची संख्या रोडावली. त्यामुळे पुढे हा नियम रद्द करण्यात आला.

स्पर्धेच्या नियमावलीतील विविध त्रुटींमुळे यापूर्वी पाच-सहा संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याची उदाहरणे आहेत. आता या हौशी मराठी नाट्यस्पर्धांचे आयोजन जिल्हा प्रशासन, हे स्थानिक नाट्यसंस्थेच्या सहकार्याने करीत आहे.

अंतिम स्पर्धेतील मराठी नाटकांचा दर्जा सुधारण्याबाबत शासनाने दिवंगत नाटककार प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने प्राथमिक, विभागीय, अंतिम अशी त्रिस्तरीय स्पर्धा घेण्याची सूचना व नागरी, अनागरी स्पर्धा गट बंद करण्याची सूचना केली होती.

पूर्वी प्राथमिक व विभागीय स्पर्धा विजेत्यांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ विभागीय पातळीवरच घेण्यात येत असे. त्यामुळे स्पर्धकांना अंतिम स्पर्धेतील विजेती नाटके पाहता येत नसत. इतर विभागातील नाट्य कलावंतांच्या भेटी विचारांचे आदानप्रदान त्यामुळे थांबले होते. आता एकाच कार्यक्रमात सर्व अंतिम नाटके सादर केली जातात. त्यामुळे कलावंतांना त्या सर्व कलाकृती पाहता यतात. अंतिम बक्षीसविजेत्या नाटकाच्या प्रयोगांचे महाराष्ट्रभर चार विभागांत सादरीकरण करणे बंधनकारक आहे.

हौशी आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धांमध्ये दुजाभाव केला जात असल्याची नाट्यसंस्थांची अजूनही तक्रार आहे. व्यावसायिक नाटकांना मोठ्या रकमा पारितोषिक म्हणून दिल्या जातात. तर हौशी नाटकांना मात्र अत्यंत कमी रक्कम दिली जाते. त्यामुळे हौशी नाट्य कलावंतांमध्ये नाराजी दिसून येते.

२०१२ हे साल या राज्य नाट्य स्पर्धेचे ५२वे वर्ष होते.

महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा