"सुभाष भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८: ओळ ३८:
[[डिसेंबर २०]], [[इ.स. २०१०]] रोजी [[मेंदू|मेंदूतील]] रक्तस्रावामुळे (की हृदयविकाराच्या झटक्याने ?) त्यांचे [[मुंबई]] येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी
[[डिसेंबर २०]], [[इ.स. २०१०]] रोजी [[मेंदू|मेंदूतील]] रक्तस्रावामुळे (की हृदयविकाराच्या झटक्याने ?) त्यांचे [[मुंबई]] येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी
’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.
’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.

प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. त्या लेखाचे पाठ्यपुस्तक मंडळाने काय हाल केले त्याची हकीकत [http://amrutmanthan.wordpress.com/2010/06/03/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE/== गड्या आपुला गाव बरा] येथे वाचता येईल.


==पुरस्कार==
==पुरस्कार==

२१:३५, ३ मार्च २०१३ ची आवृत्ती

सुभाष भेंडे
जन्म नाव सुभाष भेंडे
जन्म ऑक्टोबर १४, इ.स. १९३६
बोरी, गोवा
मृत्यू डिसेंबर २०, इ.स. २०१०
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा
कादंबरी

सुभाष भेंडे (ऑक्टोबर १४, इ.स. १९३६; बोरी, गोवा - डिसेंबर २०, इ.स. २०१०; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी साहित्यिक होते.

ऑक्टोबर १४, इ.स. १९३६ रोजी गोव्यातील बोरी या गावात भेंड्यांचा जन्म झाला. केपे या स्वतःच्या मूळ गावातून ते शिक्षणासाठी सांगली येथे गेले. त्यांचे शिक्षण सांगलीपुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. इ.स. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

डिसेंबर २०, इ.स. २०१० रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे (की हृदयविकाराच्या झटक्याने ?) त्यांचे मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी ’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.

प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. त्या लेखाचे पाठ्यपुस्तक मंडळाने काय हाल केले त्याची हकीकत गड्या आपुला गाव बरा येथे वाचता येईल.

पुरस्कार

प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेंडे कुटंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला 'सुभाष भेंडे नवोदित लेखक वाङ्मय पुरस्कार' बबन मिंडे यांच्या 'कॉमन मॅन' या कादंबरीला देण्यात आला. ११,१११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुभाष भेंडे यांचे प्रकाशित साहित्य

  • साहित्य संस्कृती (श्रीविद्या प्रकाशन, १९९९)
  • किनारा (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९४)
  • पितळी दरवाजा (श्रीविद्या प्रकाशन, १९९३)
  • निवडक गंभीर आणि गंमतीदार (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९०)
  • जिथे जातो तेथे (श्रीविद्या प्रकाशन, १९९०)
  • उद्ध्वस्त (मेनका प्रकाशन, १९८५)
  • द्राक्ष आणि रुद्राक्ष (श्रीविद्या प्रकाशन, १९८३)
  • एका डोळे, सात गळे (साना पब्लिकेशन, १९८२)
  • मार्ग सुखाचा (मॅजेस्टिक, १९८४)
  • पैलतीर (मॅजेस्टिक, १९८२)
  • स्वर्ग दोन बोटे (राधा प्रकाशन, १९८१)
  • लांबलचक सावली (विश्वमोहिनी, १९८१)
  • नेपोलियननंतर तुम्हीच (मिनल प्रकाशन, १९८१)
  • अंधारवाटा (१९७८)
  • हसवेगिरी (बा. ग. ढवळे प्रकाशन, १९७८)
  • हास-परिहास (अमेय प्रकाशन, १९७८)
  • फूल ना फुलाची पाकळी (१९७५)
  • दिलखुलास (१९७५)
  • स्मितकथा (१९७३)
  • आमचं गोय आमका जाय (१९७०)

बाह्य दुवे