"धम्मपाल रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
प्रा.डॉ. धम्मपाल भूपाल रत्नाकर (जन्म :१५-३-१९६६;मृत्यू : कोल्हापूर १७-६-२०१२) हे एक मराठी लेखक व कवी होते. ते कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात मराठीचे शाखाप्रमुख आणि महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाहक होते.
| नाव =धम्मपाल रत्‍नाकर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = धम्मपाल भूपाल रत्‍नाकर
| टोपण_नाव = दत्ता हलसगीकर
| जन्म_दिनांक = [[मार्च १५]], [[इ.स. १९६६]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[जून १७]], [[इ.स. २०१२]]
| मृत्यू_स्थान = [[कोल्हापूर]],[[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[काव्यरचना]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[वैचारिक लेख]], [[कविता]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = ह्या सैतानाच्या खांद्यावर
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =भूपाल
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =
| अपत्ये = दोन मुले
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}प्रा.डॉ. धम्मपाल भूपाल रत्नाकर (जन्म :१५-३-१९६६;मृत्यू : कोल्हापूर १७-६-२०१२) हे एक मराठी लेखक व कवी होते. ते कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात मराठीचे शाखाप्रमुख आणि महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाहक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन करत होते.


विद्यार्थिदशेपासूनच प्रशिक विद्यार्थी संघटनेद्वारे डॉ. रत्नाकर आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. डॉ. रत्नाकर हे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. यळगूड (ता. कागल) येथून अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी हॉटेलमध्ये काम केले होते.
विद्यार्थिदशेपासूनच प्रशिक विद्यार्थी संघटनेद्वारे डॉ. रत्नाकर आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. डॉ. रत्नाकर हे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. यळगूड (ता. कागल) येथून अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी हॉटेलमध्ये काम केले होते.

२२:१२, १९ जून २०१२ ची आवृत्ती

धम्मपाल रत्‍नाकर
जन्म नाव धम्मपाल भूपाल रत्‍नाकर
टोपणनाव दत्ता हलसगीकर
जन्म मार्च १५, इ.स. १९६६
मृत्यू जून १७, इ.स. २०१२
कोल्हापूर,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, काव्यरचना
भाषा मराठी
साहित्य प्रकार वैचारिक लेख, कविता
प्रसिद्ध साहित्यकृती ह्या सैतानाच्या खांद्यावर
वडील भूपाल
अपत्ये दोन मुले

प्रा.डॉ. धम्मपाल भूपाल रत्नाकर (जन्म :१५-३-१९६६;मृत्यू : कोल्हापूर १७-६-२०१२) हे एक मराठी लेखक व कवी होते. ते कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात मराठीचे शाखाप्रमुख आणि महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाहक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन करत होते.

विद्यार्थिदशेपासूनच प्रशिक विद्यार्थी संघटनेद्वारे डॉ. रत्नाकर आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. डॉ. रत्नाकर हे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. यळगूड (ता. कागल) येथून अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी हॉटेलमध्ये काम केले होते.

मायमराठीतल्या आईच्या अशा कवितांचा संग्रह प्रशांत मोरे यांनी ’माय हिंडते रानोमाळी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. सव्वाशे कवी-कवयित्रींच्या या १२९ कविता माऊलीबरोबरच काळया आईचीही सय जागवतात. ५ मे २००७ रोजी गडकरी रंगायतनमध्ये त्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्या पुस्तकातल्या एका कवितेत प्रा. रत्नाकरांनी आईचे विराट रूप दाखवताना लिहिले आहे,

मूल बनून खेळले की; तीही खेळते

सैतान बनून छळले की; तीही छळते.

डॉ. धम्मपाल रत्नाकर यांचे "हॉटेल माझा देश', "सैतानाच्या खांबावर' आणि "लक्‍तरांची गझल' हे काव्यसंग्रह गाजले. "दलित साहित्याच्या नामांतराचा वाद' आणि "विसावा' या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. विस्कट या नावाची त्यांची एक कादंबरी आहे. त्यांनी आंबेडकर चळवळीतील कवी नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा अभ्यास या विषयावर संशोधन केले आहे. आंबेडकर चळवळीतील एक समीक्षक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.

पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने इचलकरंजीसह कोल्हापूर परिसराला मे-जून २०१२ या काळात काविळीचा विळखा पडला होता. "हिपॅटायटीस ई' प्रकारच्या या काविळीने १७-६-२०१२ पर्यंत इचलकरंजी नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांसह १३ जणांचा बळी घेतला होता. त्या साथीत कदमवाडी(कोल्हापूर) येथे राहणाऱ्या धम्मपाल रत्‍नाकरांचा बळी घेतला.

पुरस्कार

डॉ. रत्‍नाकर यांना उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाचा दोन वेळा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय १ जानेवारी २००७ रोजी महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांना पुरस्कार दिला होता. साहित्य क्षेत्रातील अन्य मानाचे पुरस्कारही धम्मपाल रत्‍नाकर यांना मिळाले होते.