रफी अहमद किडवई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रफी अहमद किडवई
१९६९ चे पोस्टाचे तिकिट
वैयक्तिक माहिती
जन्म 18 February 1894
बाराबंकी, उत्तर प्रदेश
मृत्यू 24 October 1954 (aged 60)
दिल्ली
शिक्षण अलीगढ मुस्लिम विद्यापीठ

रफी अहमद किडवई (१८ फेब्रुवारी १८९४ - २४ ऑक्टोबर १९५४) एक राजकारणी, भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि इस्लामि समाजवादी होते. ते उत्तर भारतातील सध्याचे उत्तर प्रदेशातील प्रांतातील बाराबंकी जिल्ह्यातील होते.

पूर्वीचे जीवन[संपादन]

रफी अहमद यांचा जन्म बाराबंकी जिल्ह्यातील मसौली या गावी १८ फेब्रुवारी १८९४ला झाला. रफींचे चार छोटे भाऊ होते ज्यात शफी यांचा समावेश होता. कम्युनिस्ट कार्यकर्ते आणि राज्यसभेच्या सदस्या लेखक अनिस किडवई यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. ते जेएनयूमधील राजकारणामध्ये सक्रिय कम्युनिस्ट आणि स्त्रीवादी विचारसरणी असलेल्या आयशा किडवई आणि पत्रकार सीमा मुस्तफा यांचे आजी आजोबा होते. मेहफूज अहमद या दुसऱ्या भावाचा मुलगा फरीद किडवई आहे, जो समाजवादी पक्षाचा सदस्य आणि उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री होता.

राजकीय जीवन[संपादन]

अलीगडमधील मुहम्मदान एंग्लो-ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर किडवई यांनी खिलाफत आंदोलनच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १९२६ च्या निवडणुकीत ते औधमधील स्वराज पक्षाचे उमेदवार म्हणून केंद्रीय विधानसभेवर निवडून गेले.

किडवई यांच्या राजकीय चातुर्याने वादग्रस्त मुद्द्यांवरून पक्षात एकता टिकवून ठेवण्यास मदत केली. १९२९ मध्ये किडवई विधानसभेत स्वराज पक्षाच्या सचिवपदी निवडल्या गेले. मोतीलाल नेहरूंबद्दल त्यांची अत्यंत निष्ठा होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९ डिसेंबर १९२९ रोजी पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि महात्मा गांधी यांनी जानेवारी १९३० मध्ये नागरी अवज्ञा आंदोलन सुरू केले. जानेवारी १९४० मध्ये, कांग्रेस कार्यकारिणीने पूर्ण स्वराज ठरावाला प्रत्युत्तर म्हणून किदवई यांनी केंद्रीय विधानसभेचा राजीनामा दिला आणि नागरी अवज्ञा चळवळीत भाग घेतला.

प्रांत स्वायत्तता योजनेंतर्गत १९३७ मध्ये किदवई संयुक्त प्रांतातील आग्रा आणि अवध (यूपी) मधील गोविंद बल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात महसूल व तुरूंग मंत्री झाले. त्यांच्या कारभाराखाली जमींदारी व्यवस्थेला आळा घालणारा उत्तर प्रदेश हा पहिला प्रांत बनला. एप्रिल १९४६ मध्ये ते उत्तर प्रदेशचे गृहमंत्री झाले.

किडवई हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे खास मित्र होते. १९४७ मध्ये ब्रिटीश राज्याकडून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किडवई हे भारताचे पहिले संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री झाले. त्यांनी मे १९५२ ते ऑक्टोबर १९५४ केंद्रीय अन्न व कृषि मंत्रालय पण सांभाळले.

मृत्यू[संपादन]

किडवई यांचे २४ ऑक्टोबर १९५४ रोजी दिल्लीत निधन झाले. भाषण देताना दम्याचा झटका आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्याच गावी त्यांच्या दफनभूमीवर मोगल-शैलीचे समाधीस्थळ बांधले आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Kidwai, Rafi Ahmad". Oxford Dictionary of National Biography.