यशपाल
Jump to navigation
Jump to search
हा लेख हिंदी साहित्यिक यशपाल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, यशपाल (निःसंदिग्धीकरण).
प्रा. यश पाल याच्याशी गल्लत करू नका.
यशपाल (डिसेंबर ३ १९०३ - डिसेंबर २६ १९७६) हे आधुनिक हिंदी साहित्यातील एक प्रमुख कथालेखक आहेत. ते क्रांतिकारक व लेखक अशा दोन्ही रूपात ओळखले जातात. प्रेमचंद यांच्या खालोखाल हिंदीतील सुप्रसिद्ध प्रगतिशील कथालेखकांमध्ये यांचे नाव घेतले जाते. आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच यशपाल क्रांतिकारी आंदोलनांत सामील झाले, ज्यामुळे त्यांना प्रदीर्घ काळ भूमिगत तसेच कारावासात रहावे लागले. त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य साहित्याला वाहून घेतले. जे काम ते कधी काळी बंदुकीच्या माध्यमातून करीत असत, ते देशसेवेचे व्रत, जनजागरणाचे काम, त्यांनी लेखनाच्या माध्यमातून सुरू केले. यशपाल यांना साहित्य व शिक्षण या क्षेत्रात भारत सरकारकडून सन १९७० साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.