पाली (रायगड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पाली

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ३२′ २८.९८″ N, ७३° १३′ ११.८७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रायगड
लोकसंख्या ८,१६७ (२००१)
बल्लाळेश्वराचे मंदिर

पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे.

इतिहास[संपादन]

शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. [१]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी नजिक उंबरखिंड, जांभुळपाडय़ातील गणपती, कोंडगावचे धरण, नागशेत येथे खडसंबाळे लेणी, भेलीव येथील मृगगड, राजणकुंडजवळील कोंडजाईदेवी, वरदायनीदेवी, सिद्धेश्वर रस्त्यावरील एकवीस गणपती मंदिर, उन्हेऱ्याची व उद्धरची गरम पाण्याची कुंडे अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

संदर्भ व टीप[संपादन]

  1. ^ "ऐतिहासिक सुधागड-पाली". Archived from the original on 2018-11-13. 2018-11-12 रोजी पाहिले.