कूच बिहार संस्थान
कूच बिहार येथील कूच बिहार राजवाडा
कूच बिहार हे इ.स. १५८६ ते इ.स. १९४९ दरम्यान अस्तित्वात असलेले एक राज्य व संस्थान होते. ब्रिटिश राजदरम्यान बंगाल प्रांताच्या अखत्यारीखाली असलेले कूच बिहार संस्थान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये विलीन करण्यात आले व ते आजच्या पश्चिम बंगाल राज्याचा भाग आहे.
कूच बिहार शहरात मुख्यालय असलेले हे संस्थान इतिहासात विविध साम्राज्यांचा भाग राहिले होते. आजचा कूच बिहार जिल्हा ह्याच संस्थानाचे नाव लावतो.