एस.एल. भैरप्पा
एस.एल. भैरप्पा | |
---|---|
![]() |
|
जन्म नाव | सांतेशिवारा लिंगणय्या भैरप्पा |
जन्म | जुलै २६, १९३४ सांतेशिवारा, हासन जिल्हा, कर्नाटक, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | कन्नड |
साहित्य प्रकार | कादंबरी |
एस.एल. भैरप्पा (जुलै २६, १९३४ - हयात) हे लोकप्रिय कन्नड कादंबरीकार आहेत. त्यांच्या कादंबर्या मराठीसह अन्य भारतीय भाषांत अनुवादल्या गेल्या आहेत. त्यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंतु’, ‘काठ’, ‘सार्थ’ या कादंबर्यांनीही मराठी वाचकांनाही आकर्षित केले आहे. त्यांचे ‘सत्य आणि सौंदर्य’, ‘मी का लिहितो?’ यांसारखे वैचारिक ग्रंथही इंग्रजी आणि कन्नडमध्ये प्रकाशित झाले आहेत. भैरप्पा यांना अभिजात भारतीय संगीत आवडते. त्यावरही त्यांनी कादंबरी रचली आहे.
पुरस्कार[संपादन]
- साहित्य अकादमी पुरस्कार (१९७५) - 'दाटु'ह्या कन्नड कादंबरीसाठी
- सरस्वती सन्मान (इ.स. २०११)- 'मंद्र' या कादंबरीसाठी के.के. बिर्ला फाउंडेशनकडून.