भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाव कार्यकाळ विशेष बाब
सर ओस्बॉर्न स्मिथ ०१-०४-१९३५ ते ३०-०६-१९३७ रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर
एकाही नोटेवर सही नाही
सर जेम्स ब्रेड टेलर ०१-०७-१९३७ ते १७-०२-१९४३ रिझर्व बँकेच्या नोटांवर सही करणारे पहिले अधिकारी
सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर
सर बेनेगल रामा राव ०१-०७-१९४९ ते १४-०१-१९५७ गव्हर्नर पदावर सगळ्यात जास्त काळ कार्यरत
के. जी. आंबेगावकर १४-०१-१९५७ ते २८-०२-१९५७ रिझर्व बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत, कार्यकाळ ४५ दिवस

एकाही नोटवर स्वाक्षरी नाही

एच .व्ही. आर. अय्यंगार ०१-०३-१९५७ ते २८-०२-१९६२ यांच्या काळात नाण्यांची दशमान पद्धत सुरू झाली
पी. सी. भट्टाचार्य ०१-०३-१९६२ ते ३०-०६-१९६७ यांच्या काळात ॲग्रिकल्चरल री-फायनान्स कॉर्पोरेशन (१९६३),

आय.डी.बी.आय (१९६४), यु.टी.आय. (१९६४) वगैरेंची स्थापना झाली

एल. के. झा ०१-०७-१९६७ ते ३०-०५-१९७० म. गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त

दोन, पाच दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा निघाल्या

भास्कर एन. आडारकर ०४-०५-१९७० ते १५-०६-१९७० रिझर्व बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत, कार्यकाळ ४२ दिवस

केवळ म. गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त निघालेल्या नोटांवरच स्वाक्षरी आहे

एस. जगन्नाथन १६-०६-१९७० ते १९-०५-१९७५ आधी वर्ल्ड बँकेचे डायरेक्टर, नंतर आय.एम.एफ.चे डायरेक्टर
एन. सी. सेन गुप्ता १९-०५-१९७५ ते १९-०८-१९७५ रिझर्व्ह बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून कार्यरत
के. आर. पुरी २०-०८-१९७५ ते ०२-०५-१९७७ आधी एल.आय.सी. चेरमन आणि नंतर एम. डी. होते
एम. नरसिंहम् ०२-०५-१९७७ ते ३०-११-१९७७ पहिले आणि एकमेव पदोन्नतीने गव्हर्नर म्हणून नेमले गेले
डॉ. आय. जी. पटेल ०१-१२-१९७७ ते १५-०९-१९८२ रु. १,०००/-, रु. ५,०००/- आणि रु. १०,०००/-च्या चलनातील नोटा बंद झाल्या.
डॉ. मनमोहनसिंग १६-०९-१९८२ ते १४-०१-१९८५ वित्त सचिव, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अर्थ खात्याचे मंत्री आणि

देशाचे पंतप्रधान अशा पदांवर काम करणारे गव्हर्नर

अमिताभ घोष १५-०१-१९८५ ते ०४-०२-१९८५ सगळ्यात कमी कालावधीसाठी गव्हर्नर, कार्यकाळ २० दिवस
रा. ना. मल्होत्रा ०४-०२-१९८५ ते २२-१२-१९९० रु. ५००/-च्या नोटा निघाल्या
एस. व्यंकिटरामनन २२-१२-१९९० ते २२-१२-१९९२ रुपयाचे अवमूल्यन झाले
डॉ. सी. रंगराजन २२-१२-१९९२ ते २१-१२-१९९७ गव्हर्नर पदाच्या कार्यकाळानंतर आंध्र प्रदेश आणि ओरिसा

राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले

डॉ. बिमल जालान २२-११-१९९७ ते ०६-०९-२००३ मुक्त अर्थ व्यवस्थेला वेग आला
डॉ. वाय. वेणुगोपाल रेड्डी ०६-०९-२००३ ते ०५-०९-२००८ लेखक म्हणूनही प्रसिद्ध
डॉ. डी. सुब्बाराव ०६-०९-२००८ ते ०३-०९-२०१३
रघुराम राजन लवकर राजीनामा. ०३-०९-२०१३ ते ०३-०९-२०१६
उर्जीत पटेल ०३-०९-२०१६ ते १०-१२-२०१८ भारतातील भारतीय रूपया १००० व ५०० च्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण
शक्तिकांत दास १२-१२-२०१८ ते वर्तमान

बाह्य दुवे[संपादन]