टोपणनावानुसार मराठी लेखक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टोपण नाव खरे नाव
अंतर्भेदी/फरिश्ता/सत्यान्वेषी न.र. फाटक
अनंत फंदी अनंत भवानीबावा घोलप
अनिल आत्माराम रावजी देशपांडे
अनिल विश्वास गणपती वासुदेव बेहेरे
(बापु), (शेती मातीतील कवी) अनिल बाबुराव गव्हाणे
ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे
अनिरुद्ध पुनर्वसू नारायण आठवले
अप्रबुद्ध विष्णू केशव पालेकर
आनंद पुणेकर मुकुंद टाकसाळे
आनंदीआनंद मुकुंद टाकसाळे
एक हिंदू तुकाराम तात्या पडवळ
एका जनार्दन एकनाथ
ओज पर्व तुळसी परब
ओम स्वरूप बालाजी तांबे
कण्टकार्जुन कृ.श्री. अर्जुनवाडकर
कलंदर अशोक जैन
काळदंड/किरात/भ्रमर/मधुकर/सारथी कृष्णाजी लक्ष्मण सोमण
किरात/धनुर्धारी/राघवानंद रामचंद्र विनायक टिकेकर
अण्णाभाऊ साठे तुकाराम भाऊराव साठे
कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर
केयूरक विठ्ठल वामन हडप
केवलानंद सरस्वती नारायण सदाशिव मराठे
केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे
केशवसुत कृष्णाजी केशव दामले
केशवस्वामी केशव आत्माराम कुलकर्णी
कोणीतरी नरहर शंकर रहाळकर
गुळवणी अप्पाशास्त्री सदाशिव राशिवडेकर
गोपाळ शिवराम गोपाळ शिवराम लागवणकर
गोपिकातनया/जीजी मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर
ग्यानबा, रा. म. शास्त्री वि.ग. कानिटकर
चकोर/चिकित्सक/निरीक्षक पुरुषोत्तम मंगेश लाड
चंद्रगुप्त वि.सी. गुर्जर
चारुता सागर दिनकर दत्तात्रेय भोसले
जातिहृदय नारायण दामोदर सावरकर
टप्पू सुलतान मुकुंद टाकसाळे
ठणठणपाळ जयवंत दळवी
तंबी दुराई श्रीकांत बोजेवार
तुकडोजी/तुकड्यादास माणिक बंडोजी इंगळे
दमयंती सरपटवार आनंद साधले
दासगणू गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे
दादूमिया दामोदर विष्णू नेने
द्विरेफ फोंडूशास्त्री करंडे
धनुर्धारी/राघवानंद/किरात रामचंद्र विनायक टिकेकर
नाथमाधव द्वारकानाथ माधव पितळे
नाना वांद्रेकर नारायण आठवले
नारायण महाराज नारायण आठवले
निरीक्षक/चकोर/चिकित्सक पुरुषोत्तम मंगेश लाड
फकीरदास फटकळ नारायण आठवले
नारायण दाजी नारायण दाजी लाड
निषाद/पुरुषराज अलुरपांडे/स.ह.वासकर मं.वि. राजाध्यक्ष
पंडिता रमाबाई रमाबाई विपिन मेघावी
पंतोजी कृ.श्री. अर्जुनवाडकर
पिनाकि/भ्रमर/शंकर शंकर दाजीशास्त्री पदे
पुरुषराज अलुरपांडे/निषाद/स.ह.वासकर मं.वि. राजाध्यक्ष
पूर्वा नगरकर नारायण आठवले
फरिश्ता/सत्यान्वेषी/अंतर्भेदी नरहर रघुनाथ फाटक
बाप रखुमाईवर ज्ञानेश्वर
बाबा पदमनजी बा.व. मुळे
बाबाराव गणेश दामोदर सावरकर
बाबुराव अर्नाळकर चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबू मोशाय हेमंत देसाई
बाळकराम राम गणेश गडकरी
श्र इसाक मुजावर
बी B बाळकृष्ण अनंत भिडे
ब्रिटिश नंदी प्रवीण टोकेकर
भाऊ महाजन गोविंद विठ्ठल महाजन
भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य
भारद्वाज शिवराम एकनाथ भारदे
भालाकार भास्करराव बळवंत भोपटकर
भालेंदू भालचंद्र ऊर्फ गुलाबराव सीताराम सुकथनकर
भावगुप्त पद्म पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भ्रमर/शंकर/पिनाकि शंकर दाजीशास्त्री पदे
भ्रमर/मधुकर/सारथी/काळदंड/किरात कृष्णाजी लक्ष्मण सोमण
मजेत पद्मजा फाटक
मनमोहन मनमोहन नातू (गोपाळ नरहर नातू)
मदन शारंगपाणी/बाळकृष्ण दांडेकर इसाक मुजावर
महाराष्ट्रीय परशराम गोविंद चिंचाळकर
मुकुंदराय मुकुंद गणेश मिरजकर
रंगनाथस्वामी रंगनाथ बोपजी कुलकर्णी
राघवानंद/किरात/धनुर्धारी रामचंद्र विनायक टिकेकर
राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजी गणोजी रामजी गणोजी चौगुले
रा. म. शास्त्री, ग्यानबा वि.ग. कानिटकर
रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई
रेठरेकर श्रीधर कृष्ण कुलकर्णी
लोकहितवादी [गो.ह. देशमुख]]
विजयराजे डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे
विद्यानंद दामोदर केशव पांडे
विभावरी शिरूरकर, श्रद्धा, बी.के.,कटुसत्यवादिनी, एक भगिनी, बाळुताई खरे मालती बेडेकर
वि.रा. भाटकर द.मा. मिरासदार
विरूपाक्ष संभाजी कदम
वीर वामनराव जोशी वामन गोपाळ जोशी
शंकर/पिनाकि/भ्रमर शंकर दाजीशास्त्री पदे
शमा दत्तात्रेय गणेश गोडसे
शशिकांत पुनर्वसू मोरेश्वर शंकर भडभडे
शांताराम के.ज. पुरोहित
शांताराम शांताराम विठ्ठल मांजरेकर
शारदाश्रमवासी पुरुषोत्तम गोपाळ काणेकर
शारदाश्रमवासी विठ्ठल जिवाजी नाडकर्णी
श्रीदादाभाई मंगेश रामचंद्र टाकी
श्रीभाई रामचंद्र शंकर टाकी
सच्चिदानंद महादेव मल्हार जोशी
सखाराम अर्जुन सखाराम अर्जुन राऊत
सख्या हरी दत्तू बांदेकर
सख्या हरी नारायण आठवले
संजय माधव पंढरीनाथ शिखरे
सत्यान्वेषी/फरिश्ता/अंतर्भेदी नरहर रघुनाथ फाटक
संदेश अच्युत बळवंत कोल्हटकर
समर्थ रामदास
सवाई नाटकी राम गणेश गडकरी
सहकारी कृष्ण कृष्णाजी अनंत एकबोटे
स.ह. वासकर/निषाद/पुरुषराज अलुरपांडे मं.वि. राजाध्यक्ष
साधुदास गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सारथी/काळदंड/किरात/भ्रमर/मधुकर कृष्णाजी लक्ष्मण सोमण
सुमेध वडावाला मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड
सृष्टिलावण्या मृदुला तांबे
स्वरूपानंद रामचंद्र विष्णू गोडबोले
स्वामी सच्चिदानंद महादेव मल्हार जोशी
स्वामी समर्थ ????
हंस बाळकृष्ण मल्हार बीडकर
अनुतनय चंद्रकांत काशिनाथ निकाडे


लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती? मौखिक परंपरेने साहित्याचे आदान-प्रदान होत असलेल्या काळात *मक्ता* प्रचलित होता. आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, ओवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून पुढीलप्रमाणे रचनाकार आपले नाव त्यात गुंफत असत त्यालाच उर्दूमध्ये मक्ता असे म्हणतात.

' *नामा* म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी॥ उभा तू प्रसंगा ॥॥ ' *तुका* म्हणे तुज । सोडविला कोणी ॥ एक चक्रपाणी ।॥ वाचुनिया ॥॥' ' *ज्ञानदेव* म्हणे । व्यासाचिये खुणा ॥ द्वारकेचा राणा ।॥ पांडवाघरी ॥॥' ' *एका* जनार्दनी । भोग प्रारब्धाचा ॥ हरीकृपे त्याचा ।॥ नाश होय ॥॥' 'आठवुणी हैदर गुरुजींला, *उमाजी* गातो पवाड्याला जी रं जी ॥' संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, शाहीर उमाजी सरनाईक यांनी आपल्या रचनेत अशा प्रकारे मक्ता गुंफल्याचे पाहावयास मिळते. मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला आस्तेआस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरुवात झाली. आणि त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरुवात झाली. या नावालाच टोपणनाव असे म्हणतात. हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत.

  • अगदी सुरुवातीच्या काळात नावात कमीतकमी शब्द असावेत या हेतूने टोपणनाव धारण केले असावे. उदा. तुका, जनी, नामा, ज्ञानदेव
  • पुढच्या काळात आपल्या ज्ञातीचे/समूहाचे/ नाव कळू नये यासाठी रचनाकारांनी अशा टोपणनावांचा आधार घेतला असावा.
  • स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना गुलामगिरीविरुद्ध चेतवण्यासाठी देशप्रेमाने भारलेले काव्य साकारू लागले. असे काव्य वाचून-ऐकून-गाऊन किंवा स्वातंत्र्याचा अट्टाहास धरणारे लेख, कथा, वर्तमानपत्रातील सदरे वाचून तरुण स्वातंत्र्याबाबत जागृत होऊ लागले. तेव्हा असे कवी-लेखक इंग्रजांना राजद्रोही वाटू लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खटले भरले गेले. या गुन्ह्याच्या व खटल्यांच्या कटकटीतून स्वतःला सुरक्षित ठेवून स्वातंत्र्याचे कार्य निर्धोकपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी टोपणनावाचा आधार घेतला गेला.
  • आपले लेखन हे एखाद्याच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने घडत आहे. किंबहुना आपले जीवन घडण्यासाठी आपल्या गुरूंचे खूप योगदान आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या टोपणनावात अशा आदरणीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला गेला. उदा. आठवुणी हैदर गुरुजींला, एका जनार्दनी, बाप रखुमाईवरा
  • काही व्यक्तींनी आपले भवितव्य व जीवन घडण्यासाठी अनमोल सहकार्य केलेले असते. याची जाणीव म्हणून त्या व्यक्तींच्या नावाशी आपले नाव किंवा नाते जोडून टोपणनाव धारण केले जाते. उदा. अनुतनय, चंद्रकुमार, कुसुमाग्रज, केशवसुत, गोविंदाग्रज, रत्नाकर
  • काही व्यक्ती लाजाळू असतात. त्यांना आपल्या रचना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतात, पण आपल्या मूळ नावाची गुप्तता ठेवून. अशावेळी त्या व्यक्ती मूळ नावाशी दुरान्वयेही संबंध नसणारे टोपणनाव घेतात.
  • तसेच काही रचनाकार भित्रे असतात, रचना उत्तम असतानाही त्यांना आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वतःचे नाव लावायचे धाडस होत नाही. टोपणनावाचा आधार घेऊन ते त्या रचना प्रसिद्ध करतात व तटस्थपणे प्रतिक्रिया अजमावतात.
  • कधीकधी सहज वेगळेपण म्हणूनही टोपणनाव स्वीकारले जाते. अनेक लेखनप्रकारात लिहिणारे. प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे टोपणनाव निवडतात.
  • काही संपादक संकुचित वृत्तीने ठरावीक ज्ञातीच्या रचनाकारांचेच साहित्य प्रसिद्धीसाठी निवडत असत, त्यांना वळवण्यासाठी, त्यांच्या आवडीच्या नावाशी साधर्म्य असणारे टोपणनाव निवडल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात.
  • विनोदी/चावट/अश्लील लेखन करणारे सर्रास टोपणनावाआडून लेखन करतात.
  • ज्यांच्या लेखनास घरातून/स्वजनांकडून विरोध असतो, ते लोक टोपणनावाने लेखन पाठवून लेखनाची हौस पूर्ण करत असतात.
  • काही लोक प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोपणनाव धारण करतात.
  • स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही विद्वानांनी व पुरुषवादी लेखन करणाऱ्या काही विदूषींनी त्या साहित्य प्रकारासाठी साजेसे टोपणनाव घेऊन आपले लेखन समाजमनात यशस्वीपणे रुजविले आहे.

हे देखील पहा[संपादन]