"तलाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३: ओळ ३:
गाव कामगार तलाठी(हिंदीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक अधिकारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर गावात काम करणारा तलाठी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.
गाव कामगार तलाठी(हिंदीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक अधिकारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर गावात काम करणारा तलाठी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.
== सुरुवात ==
== सुरुवात ==
अफगाण बादशाह शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पदाची स्थापना केली होती. भारतातील ब्रिटिश राजवटीत
१८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी या पदाची निर्मिती केली गेली. १९१८ साली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली व पगारी तलाठी पदे सुरू झाली.
१८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी(हिंदीत )पटवारी या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली.


== तलाठ्याची कर्तव्ये ==
== तलाठ्याची कर्तव्ये ==

११:५९, १३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

गाव कामगार तलाठी(हिंदीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक अधिकारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर गावात काम करणारा तलाठी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.

सुरुवात

अफगाण बादशाह शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पदाची स्थापना केली होती. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी(हिंदीत )पटवारी या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली.

तलाठ्याची कर्तव्ये

ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन सरकार व जनता यांमधील दुव्याचे काम करणे. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.

कार्यक्षेत्र

सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक गाव कामगार तलाठी असतो. अशा गावाच्या समूहास हिंदीत सजा अथवा साझा असे म्हटले जाते. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील सर्वसाधारणपणे १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो. तलाठी - मंडळ अधिकारी - तहसीलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी अशी पदांची चढती रचना आहे.

नोंद वह्या

प्रत्येक गावी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या विशिष्ट गाव नमुन्यांमध्ये तलाठी-दप्तर ठेवलेले असते. या नोंदवहीचे नमुने महसूल कायद्यामध्ये तयार करुन देण्यात आले आहेत.