"मराठी चित्रपटांचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}


चित्रपट व्यवसायाच्या सुरवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही त्याचा जो विकास झाला त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. १८९५ च्या जुलैमध्ये लुमिअरे बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा पहिला खेळ मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये झाला. १९१२ मध्ये पुंडलीक चे चित्रीकरण याच शहरी झाले आणि दादासाहेब फाळके - भारतीय सिनेमाचे जनक - यांनी राजा हरिश्चंद्र या, सिनेइतिहासातील मैलाचा टप्पा ठरणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरणही इथेच केले. १९३१ साली बोलक्या चित्रपटाचे आगमन होईपर्यंत मुंबईच भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, पण तिच्याबरोबरच पुणे, खडकी, कोल्हापूर, नाशिक या गावीही चित्रीकरणाचे काम चालू होते. कोल्हापूरला बाबुराव पेंटर यांच्या उत्कृष्ट `सेटस्‌' मुळे चित्रीकरणाचे एका श्रेष्ठ कलेत रूपांतर झाले. त्यांची सैरंध्री एतद्‍देशीय चित्रपट कलेतील एक लक्षणीय टप्पा आहे.
सुरवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही भारतीय चित्रपट व्यवसायाचा जो विकास झाला, त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. १८९५ च्या जुलैमध्ये लुमिअरे बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा पहिला खेळ मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये झाला. १९१२ मध्ये मराठी चित्रपट 'पुंडलीक'चे चित्रीकरण याच शहरी झाले. दादासाहेब फाळके - भारतीय सिनेमाचे जनक - यांनी राजा हरिश्चंद्र या, सिनेइतिहासातील मैलाचा टप्पा ठरणार्‍या चित्रपटाचे चित्रीकरणही येथेच केले. १९३१ साली बोलक्या चित्रपटाचे आगमन होईपर्यंत मुंबईच भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, पण तिच्याबरोबरच पुणे, खडकी, कोल्हापूर, नाशिक या गावीही चित्रीकरणाचे काम चालू होते. कोल्हापूरला बाबुराव पेंटर यांच्या उत्कृष्ट `सेट्स‌' मुळे चित्रीकरणाचे एका श्रेष्ठ कलेत रूपांतर झाले. त्यांचा सैरंध्री हा एतद्‍देशीय चित्रपटकलेतील एक लक्षणीय टप्पा आहे.
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मुंबईतील चित्रपट व्यवसायाची भरभराट झाली. अनेक चित्रपट कंपन्या अस्तित्वात आल्या. पौराणिक कथा विषयांबरोबरच मराठ इतिहासातील प्रसंग, तसेच रोजच्या जीवनातील समस्याही चित्रीकरणासाठी निवडल्या गेल्या. या कालातील दोन सर्वात उल्लेखनीय चित्रपट म्हणजे महाराष्ट्र फिल्म कं. चा ऐतिहासिक चित्रपट सिंहगड (१९२३) आणि त्याच कंपनीचा सामाजिक चित्रपट सावकारी पाश (१९२५). या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांचेच आहे. सिंहगड मध्ये तानाजीच्या आणि शिवाजीच्या इतर शूर शिपायांच्या देशभक्तीची कथा चित्रीली आहे. तर सावकारी पाश मध्ये गरीब मराठी शेतकऱ्याच्या सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीची. हा चित्रपट सत्यजित राय यांच्या पाथेर पांचाली आधी चाळीस वर्षे काढला गेला असून त्यातील सद्यःस्थितीचे चित्रीकरण हृदयाला भिडणारे आहे. याला भारतातील पहिला वास्तव चित्रपट म्हणता येईल. यातील तरुण शेतकऱ्याची भूमिका करणारे व्ही. शांताराम पुढे एक श्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी आणखी दोन महत्त्वाच्या मूक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली ती याच काळात. नेताजी पालकर (१९२८) आणि उदयकाल (१९३०). या चित्रपटाचे मूळ नांव स्वराज्य-तोरण होते. पण त्या काळच्या सेन्सॉरने त्यास हरकत घेतल्यावरुन ते बदलून उदयकाल असे ठेवण्यात आले. त्यात शिवाजीच्या तारुण्यातील धाडसी मोहिमांची कथा दाखवण्यात आली होती.
विसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात मुंबईतील चित्रपट व्यवसायाची भरभराट झाली. अनेक चित्रपट कंपन्या अस्तित्वात आल्या. पौराणिक कथांसारख्या विषयांबरोबरच मराठ्यांच्या इतिहासातील घटनाप्रसंग, तसेच रोजच्या जीवनातील समस्या हे विषयही चित्रपटांच्या कथानकांसाठी निवडले गेले. या कालातील दोन सर्वात उल्लेखनीय चित्रपट म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनी चा ऐतिहासिक चित्रपट [[सिंहगड]] (१९२३) आणि त्याच कंपनीचा सामाजिक चित्रपट [[सावकारी पाश]] (१९२५). या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांचेच आहे. 'सिंहगड'मध्ये तानाजीच्या आणि शिवाजीच्या इतर शूर शिपायांच्या देशभक्तीची कथेचे चित्रण आहे. तर 'सावकारी पाश'मध्ये गरीब मराठी शेतकर्‍याच्या सावकाराकडून होणार्‍या पिळवणुकीचे. हा चित्रपट सत्यजित राय यांच्या 'पाथेर पांचाली'च्या चाळीस वर्षे आधी काढला गेला असून त्यातील तत्कालीन परिस्थितीचे चित्रीकरण हृदयाला भिडणारे आहे. या चित्रपटाला भारतातील पहिला वास्तव चित्रपट म्हणता येईल. यातील तरुण शेतकर्‍याची भूमिका करणारे व्ही. शांताराम पुढे एक श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आले. बाबूराव पेंटर यांनी आणखी दोन ऐतिहासिक मूकपटांची निर्मिती केली. नेताजी पालकर (१९२८) आणि उदयकाल (१९३०). या दुसर्‍या चित्रपटाचे मूळ नांव स्वराज्य-तोरण होते. पण त्या काळच्या सेन्सॉरने त्यास हरकत घेतल्यावरुन ते बदलून उदयकाल असे ठेवण्यात आले. त्यात शिवाजीच्या तारुण्यातील धाडसी मोहिमांची कथा दाखवण्यात आली होती.
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट|मराठी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट|मराठी भाषेमधील चित्रपट]]

२३:३९, ५ मार्च २०१० ची आवृत्ती

सुरवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही भारतीय चित्रपट व्यवसायाचा जो विकास झाला, त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. १८९५ च्या जुलैमध्ये लुमिअरे बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा पहिला खेळ मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये झाला. १९१२ मध्ये मराठी चित्रपट 'पुंडलीक'चे चित्रीकरण याच शहरी झाले. दादासाहेब फाळके - भारतीय सिनेमाचे जनक - यांनी राजा हरिश्चंद्र या, सिनेइतिहासातील मैलाचा टप्पा ठरणार्‍या चित्रपटाचे चित्रीकरणही येथेच केले. १९३१ साली बोलक्या चित्रपटाचे आगमन होईपर्यंत मुंबईच भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, पण तिच्याबरोबरच पुणे, खडकी, कोल्हापूर, नाशिक या गावीही चित्रीकरणाचे काम चालू होते. कोल्हापूरला बाबुराव पेंटर यांच्या उत्कृष्ट `सेट्स‌' मुळे चित्रीकरणाचे एका श्रेष्ठ कलेत रूपांतर झाले. त्यांचा सैरंध्री हा एतद्‍देशीय चित्रपटकलेतील एक लक्षणीय टप्पा आहे. विसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात मुंबईतील चित्रपट व्यवसायाची भरभराट झाली. अनेक चित्रपट कंपन्या अस्तित्वात आल्या. पौराणिक कथांसारख्या विषयांबरोबरच मराठ्यांच्या इतिहासातील घटनाप्रसंग, तसेच रोजच्या जीवनातील समस्या हे विषयही चित्रपटांच्या कथानकांसाठी निवडले गेले. या कालातील दोन सर्वात उल्लेखनीय चित्रपट म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनी चा ऐतिहासिक चित्रपट सिंहगड (१९२३) आणि त्याच कंपनीचा सामाजिक चित्रपट सावकारी पाश (१९२५). या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांचेच आहे. 'सिंहगड'मध्ये तानाजीच्या आणि शिवाजीच्या इतर शूर शिपायांच्या देशभक्तीची कथेचे चित्रण आहे. तर 'सावकारी पाश'मध्ये गरीब मराठी शेतकर्‍याच्या सावकाराकडून होणार्‍या पिळवणुकीचे. हा चित्रपट सत्यजित राय यांच्या 'पाथेर पांचाली'च्या चाळीस वर्षे आधी काढला गेला असून त्यातील तत्कालीन परिस्थितीचे चित्रीकरण हृदयाला भिडणारे आहे. या चित्रपटाला भारतातील पहिला वास्तव चित्रपट म्हणता येईल. यातील तरुण शेतकर्‍याची भूमिका करणारे व्ही. शांताराम पुढे एक श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आले. बाबूराव पेंटर यांनी आणखी दोन ऐतिहासिक मूकपटांची निर्मिती केली. नेताजी पालकर (१९२८) आणि उदयकाल (१९३०). या दुसर्‍या चित्रपटाचे मूळ नांव स्वराज्य-तोरण होते. पण त्या काळच्या सेन्सॉरने त्यास हरकत घेतल्यावरुन ते बदलून उदयकाल असे ठेवण्यात आले. त्यात शिवाजीच्या तारुण्यातील धाडसी मोहिमांची कथा दाखवण्यात आली होती.