"फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र''' हे महाराष्ट्रातील एक घोषवा... |
(काही फरक नाही)
|
११:४२, ५ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती
फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील एक घोषवाक्य आहे. महाराष्ट्राला महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. या विचारवंतांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राला "पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र" म्हटले जाते. या व्यक्तींनी उपेक्षितांच्या ‘शिक्षण व हक्कासाठी' संघर्ष केला. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ या त्रयीचा नामोल्लेख महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणात मोठ्या प्रमाणावर केला जातो.