"कायस्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
हा कायस्थ समाज उत्तरी भारतातील अतिशय प्रगत समाज समजला जातो. चातुर्वणांपैकी कायस्थ हे कोणत्या वर्णाचे हा विषय नेहमीच विवाद्य राहिला आहे. पण कायस्थ जातीचे स्थान क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या
हा कायस्थ समाज उत्तरी भारतातील अतिशय प्रगत समाज समजला जातो. चातुर्वणांपैकी कायस्थ हे कोणत्या वर्णाचे हा विषय नेहमीच विवाद्य राहिला आहे. पण कायस्थ जातीचे स्थान क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या
दरम्यान कोठेतरी असावे, असे साधारणपणे समजले जाते. महाराष्ट्रात सी.के.पी. (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) या जातीची माणसे पुढारलेली समजली जातात. यांना मांसाहार वर्ज्य नसतो. उत्तरी भारतात काश्मीरपासून बंगालपर्यंत कायस्थ समाज आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, माजी पंतप्रधान कै. लाल बहादुर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस हे कायस्थ होते. पाकिस्तानातसुद्धा मुस्लिम कायस्थ या जातीचे लोक आहेत.
दरम्यान कोठेतरी असावे, असे साधारणपणे समजले जाते. महाराष्ट्रात सी.के.पी. (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) या जातीची माणसे पुढारलेली समजली जातात. यांना मांसाहार वर्ज्य नसतो. उत्तरी भारतात काश्मीरपासून बंगालपर्यंत कायस्थ समाज आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, माजी पंतप्रधान कै. लाल बहादुर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस हे कायस्थ होते. पाकिस्तानातसुद्धा मुस्लिम कायस्थ या जातीचे लोक आहेत.

[[भाऊबीज]]ेच्या दिवशी कायस्थ लोक चित्रगुप्ताच्या देवळात जातात आणि दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.


[[वर्ग:हिंदू समाजव्यवस्था]]
[[वर्ग:हिंदू समाजव्यवस्था]]

१६:३०, ५ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

कायस्थ समाज निर्मितीच्या काही आख्यायिका : जो पूर्वी ब्रह्मदेवाच्या शरीरात राहात होता{कायस्थ) आणि नंतर बाहेर पडून मर्त्य लोकांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवण्याचे काम करू लागला तो चित्रगुप्त हा पहिला कायस्थ, असा समज आहे.

चित्रगुप्ताच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी ऐरावती. ही सूर्यदेवतेची नात होती. नंदिनीला चार पुत्र झाले. भानू, मतिमान, चारू आणि सुचारू. या चौघांपासून अनुक्रमे श्रीवास्तव, सक्सेना, माथुर आणि गौड या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.

चित्रगुप्ताची दुसरी पत्नी शोभावती. तिला आठ मुले झाली. करुण, चित्रचारू, भानुप्रकाश, युगंधर, वीर्यवान, जितेंद्रिय, सदानंद आणि विश्वभानू. या आठ पुत्रांपासून अनुक्रमे कर्ण कायस्थ, निगम, भटनागर, अंबष्ठ, आस्थाना, कुलश्रेष्ठ, सूरध्वज, बाल्मीक या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.

मिथिला नगरीमध्ये वसती करून राहिलेले कर्ण कायस्थ, स्वतःची जात ’कर्ण कायस्थ मैथिलक’ अशी सांगतात.

हा कायस्थ समाज उत्तरी भारतातील अतिशय प्रगत समाज समजला जातो. चातुर्वणांपैकी कायस्थ हे कोणत्या वर्णाचे हा विषय नेहमीच विवाद्य राहिला आहे. पण कायस्थ जातीचे स्थान क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या दरम्यान कोठेतरी असावे, असे साधारणपणे समजले जाते. महाराष्ट्रात सी.के.पी. (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) या जातीची माणसे पुढारलेली समजली जातात. यांना मांसाहार वर्ज्य नसतो. उत्तरी भारतात काश्मीरपासून बंगालपर्यंत कायस्थ समाज आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, माजी पंतप्रधान कै. लाल बहादुर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस हे कायस्थ होते. पाकिस्तानातसुद्धा मुस्लिम कायस्थ या जातीचे लोक आहेत.

भाऊबीजेच्या दिवशी कायस्थ लोक चित्रगुप्ताच्या देवळात जातात आणि दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.