"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:


याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.
याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.

==अधिक मासाबद्दल विशेष माहिती==
दोन अधिक मासांत जास्तीत जास्त ३५ महिन्यांचे आणि कमीतकमी २७ महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत.


===वेगवेगळी नावे===
===वेगवेगळी नावे===

२१:४६, ८ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र. गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.

सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजराथ आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.

चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतच्या कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्रमहिने असतात, अगोदरचा अधिक महिना आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो.

केव्हाकेव्हा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशा वेळी क्षयमास येतो.

स्पष्टीकरण

चांद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. एका महिन्यात सूर्य साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव 'रिपीट' करण्यात येते.

ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना.

याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.

अधिक मासाबद्दल विशेष माहिती

दोन अधिक मासांत जास्तीत जास्त ३५ महिन्यांचे आणि कमीतकमी २७ महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत.

वेगवेगळी नावे

या अधिक मासास, पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास असेही म्हणतात.

गेल्या काही वर्षांतील अधिक मास

अधिक मास साधारणपणे दर तीन हिंदू वर्षांनी येतो. गेल्या काही ग्रेगरियन वर्षांतील व पुढील वर्षांतील अधिक मास : -

  • १९७४ भाद्रपद
  • १९७७ श्रावण
  • १९८० ज्येष्ठ
  • १९८२ आश्विन
  • १९८५ श्रावण
  • १९८८ ज्येष्ठ
  • १९९१ वैशाख
  • १९९३ भाद्रपद
  • १९९६ आषाढ़
  • १९९९ ज्येष्ठ
  • २००१ आश्विन
  • २००४ श्रावण
  • २००७ ज्येष्ठ
  • २०१० वैशाख
  • २०१२ भाद्रपद
  • २०१५ आषाढ़
  • २०१८ ज्येष्ठ
  • २०२० आश्विन
  • २०२३ श्रावण
  • २०२६ ज्येष्ठ
  • २०२९ चैत्र
  • २०३१ भाद्रपद

ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.


पौराणिक कथा

या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनेला सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होउन तो मास वैकंठात विस्णूकडे आपले गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.

हेही बघा

बाह्यदुवे