"रवींद्र देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|रवींद्र देसाई(संगीतकार)}} रवींद्र देसाई (१९४७-२०१५) हे सोप्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


वर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटीत स्वरूपात वाचकांना समजावून देण्याच्या हातोटीमुळे देसाई यांची पुस्तके वाचकांसाठी मार्गदर्शक ठरली. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांच्या संपादनात रवींद्र देसाई यांचे मोलाचे योगदान होते.
वर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटीत स्वरूपात वाचकांना समजावून देण्याच्या हातोटीमुळे देसाई यांची पुस्तके वाचकांसाठी मार्गदर्शक ठरली. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांच्या संपादनात रवींद्र देसाई यांचे मोलाचे योगदान होते.

==व्याख्याने आणि सामाजिक कार्य==
गोबर गॅस या क्षेत्रात देसाई यांनी मूलभूत काम केले. मुळशी, मावळ तालुक्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागामध्ये नागरिकांना रास्त दरामध्ये गोबर गॅस उपलब्ध करून दिला. लेखणीबरोबरच देसाई यांचे वाणीवरही प्रभुत्व होते. रसाळ आणि नर्मविनोदी वक्तृत्वशैलीने ते श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करीत असत. विषयाची सखोल जाण आणि श्रोत्यांबरोबर खेळीमेळीच्या गप्पा वाटाव्यात अशी शैली यामुळे त्यांची व्याख्याने ही मेजवानी असायची. अनेक कळीच्या सामाजिक विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सामाजिक माध्यमांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. एखाद्या समस्येचे वेगळ्या पद्धतीने उत्तर शोधण्याची त्यांची सर्जनशीलता लेखनातून प्रतिबिंबित होत असे.

रविंद्र देसाई अविवाहित होते. देसाई यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

==रवींद्र देसाई यांनी लिहिलेली पुस्तके==
* एक्सेल २०००
* कसा निवडावा कॉम्प्यूटर
* क... क... कॉम्प्यूटरचा
* तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही 'श्रीं' चीच इच्छा आहे
* नव्या स्वरुपात एक्सेल
* प्रभावी भाषणकला
* शेअर बाजार - जुगार? छे, बु्द्धिबळाचा डाव
* सर्वांसाठी ई-मेल
* हात ना पसरू कधी... (अनुवादित)
* हे सारे मला यायलाच हवे !

==पुरस्कार==
* ‘क-क-कॉम्प्युटरचा’, ‘हात ना पसरू कधी’ आणि ‘ग्यानबाचा गोबर गॅस’ या त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य सरकारचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाले होते.

[[वर्ग:मराठी लेखक]]

२३:३१, २३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

रवींद्र देसाई (१९४७-२०१५) हे सोप्या भाषेत संगणकासारख्या विषयांवर पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आणि वक्ते होते. त्यांनीं लेखनातून संगणक, माहिती तंत्रज्ञान, शेअर बाजार असे विविध विषय हाताळले. समृद्ध करणारी आशयपूर्ण मांडणी, वाचकाला सहज समजेल अशी सुलभ भाषा आणि नर्मविनोदाने नटलेली लेखनशैली ही त्यांच्या पुस्तकांची वैशिष्ट्ये होती.

वर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटीत स्वरूपात वाचकांना समजावून देण्याच्या हातोटीमुळे देसाई यांची पुस्तके वाचकांसाठी मार्गदर्शक ठरली. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांच्या संपादनात रवींद्र देसाई यांचे मोलाचे योगदान होते.

व्याख्याने आणि सामाजिक कार्य

गोबर गॅस या क्षेत्रात देसाई यांनी मूलभूत काम केले. मुळशी, मावळ तालुक्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागामध्ये नागरिकांना रास्त दरामध्ये गोबर गॅस उपलब्ध करून दिला. लेखणीबरोबरच देसाई यांचे वाणीवरही प्रभुत्व होते. रसाळ आणि नर्मविनोदी वक्तृत्वशैलीने ते श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करीत असत. विषयाची सखोल जाण आणि श्रोत्यांबरोबर खेळीमेळीच्या गप्पा वाटाव्यात अशी शैली यामुळे त्यांची व्याख्याने ही मेजवानी असायची. अनेक कळीच्या सामाजिक विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सामाजिक माध्यमांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. एखाद्या समस्येचे वेगळ्या पद्धतीने उत्तर शोधण्याची त्यांची सर्जनशीलता लेखनातून प्रतिबिंबित होत असे.

रविंद्र देसाई अविवाहित होते. देसाई यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

रवींद्र देसाई यांनी लिहिलेली पुस्तके

  • एक्सेल २०००
  • कसा निवडावा कॉम्प्यूटर
  • क... क... कॉम्प्यूटरचा
  • तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही 'श्रीं' चीच इच्छा आहे
  • नव्या स्वरुपात एक्सेल
  • प्रभावी भाषणकला
  • शेअर बाजार - जुगार? छे, बु्द्धिबळाचा डाव
  • सर्वांसाठी ई-मेल
  • हात ना पसरू कधी... (अनुवादित)
  • हे सारे मला यायलाच हवे !

पुरस्कार

  • ‘क-क-कॉम्प्युटरचा’, ‘हात ना पसरू कधी’ आणि ‘ग्यानबाचा गोबर गॅस’ या त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य सरकारचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाले होते.