"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. <br />
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. <br />
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर [[बाळ ठाकरे]] यांनी अनेक वेळा [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी [[पु.ल.देशपांडे]] यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या [[बाळ ठाकरे]] यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर [[बाळ ठाकरे]] यांनी अनेक वेळा [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी [[पु.ल.देशपांडे]] यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या [[बाळ ठाकरे]] यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.

==[[पुष्पा भावे]] यांची शिवेसेना आणि [[बाळ ठाकरे]] यांच्याबद्दलची मते==
आयबीएन लोकमतवर निखिल वागळेंनी ६ मार्च २०१० रोजी घेतलेल्या मुलाखतीत [[पुष्पा भावे]] यांनी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे आपले सडेतोड विचार व्यक्त केले. त्यांच्या मते:<br />
१. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडित आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.<br />
२. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली.<br />
३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोईस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरू झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता.
४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेव्हा ते ध्यानात आले, तेव्हा फार उशीर झाला होता.<br />
६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्‍यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होत आहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारे नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.<br />
शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. [[पुष्पा भावे]] या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर होत्या. त्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग नव्हता, दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.


==पुष्पा भावे यांचे लेखन==
==पुष्पा भावे यांचे लेखन==

१५:१७, १५ मे २०१५ ची आवृत्ती

पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार) (जन्म : २६ मार्च, ?? - ) या एक मराठी साहित्यिक आहेत.

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात.

उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.

पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या आहेत. अतिशय मुद्देसूद आणि विद्वत्तापूर्ण असे त्यांचे वक्तृत्त्व ऐकणार्‍याला वैचारिक खाद्य देते. त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांना एक प्रकारची मेजवानीच असते.

बाळ ठाकरे यांच्या नावाला विरोध

इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता.
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर बाळ ठाकरे यांनी अनेक वेळा पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी पु.ल.देशपांडे यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या बाळ ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.

पुष्पा भावे यांची शिवेसेना आणि बाळ ठाकरे यांच्याबद्दलची मते

आयबीएन लोकमतवर निखिल वागळेंनी ६ मार्च २०१० रोजी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावे यांनी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे आपले सडेतोड विचार व्यक्त केले. त्यांच्या मते:
१. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडित आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली.
३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोईस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरू झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता. ४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेव्हा ते ध्यानात आले, तेव्हा फार उशीर झाला होता.
६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्‍यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होत आहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारे नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. पुष्पा भावे या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर होत्या. त्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग नव्हता, दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.

पुष्पा भावे यांचे लेखन

पुष्पा भावे यांनी अनेक विषयांवर विविध संपादकांच्या पुस्तकांत लेखन केले आहे. त्यापैकी काही हे -

  • अभिरुची : ग्रामीण आणि नागर (संपादक - गो. म. कुलकर्णी
  • मराठी टीका (संपादक - वसंत दावतर)
  • महात्मा फुले गौरव ग्रंथ
  • विविध ज्ञानविस्तार या लेखसूचीचे संकलन
  • डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
  • जहन्नम (प्रतिमा जोशी यांच्या निवडक कथा) - संपादिका - पुष्पा भावे


पुष्पा भावे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू
  • गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित - मूळ लेखक - महमूद ममदानी; सह‍अनुवादक - मिलिंद चंपानेरकर)
  • रंग नाटकाचे

पुरस्कार

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्य जीवनगौरव पुरस्कार (१० जानेवारी २०१५)