"शाहीर साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने पुनर्निर्देशन ठेउन लेख कृष्णराव साबळे वरुन शाहीर साबळे ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''कृष्णराव गणपतराव साबळे''' उर्फ '''शाहीर साबळे''' (जन्म १९२३) ह्यांनी स्वातंत्र्य चळवळ [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीत]] [[शाहीर]] म्हणून योगदान दिले आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{cite newssantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/chicken-egg-management-187663/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | work=लोकसत्ता | date=३ सप्टेंबर २०१३ | accessdate=२१ सप्टेंबर २०१३ | author=संजय वझरेकर | location=मुंबई | आवृत्ती=बिटा}}</ref> ते गितकार, गायक, ढोलकी वादक तसेच नाटककार आहेत. ‘महाराष्ट्राची लोकधारा’तून मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून त्यांचे प्रयत्न असतात.
'''कृष्णराव गणपतराव साबळे''' उर्फ '''शाहीर साबळे''' (जन्म पसरणी-सातारा जिल्हा, ३ सप्टेंबर, १९२३; मृत्यू : मुंबई, २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्याचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत]] [[शाहीर]] म्हणून फार मोठे योगदान दिले आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात.<ref>{{cite newssantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/chicken-egg-management-187663/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | work=लोकसत्ता | date=३ सप्टेंबर २०१३ | accessdate=२१ सप्टेंबर २०१३ | author=संजय वझरेकर | location=मुंबई | आवृत्ती=बिटा}}</ref> मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझ” हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले.

==बालपण आणि शिक्षण==
सातारा जिल्ह्यातील पसरणी (ता. वाई) या छोट्या खेड्यात तीन सप्टेंबर १९२३ रोजी कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.

==सामाजिक कार्यात सहभाग==
अमळनेरला असताना साबळे यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर [[भाऊराव पाटील]], [[सेनापती बापट]] व क्रांतिसिंह [[नाना पाटील]] या मंदिर प्रवेश- प्रसंगी उपस्थित होते.


== लेखन ==
== लेखन ==
*माझा पवाडा (आत्मचरित्र)
* माझा पवाडा (आत्मचरित्र)
== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१४:१८, २२ मार्च २०१५ ची आवृत्ती

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (जन्म पसरणी-सातारा जिल्हा, ३ सप्टेंबर, १९२३; मृत्यू : मुंबई, २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्याचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान दिले आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात.[१] मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझ” हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले.

बालपण आणि शिक्षण

सातारा जिल्ह्यातील पसरणी (ता. वाई) या छोट्या खेड्यात तीन सप्टेंबर १९२३ रोजी कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.

सामाजिक कार्यात सहभाग

अमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश- प्रसंगी उपस्थित होते.

लेखन

  • माझा पवाडा (आत्मचरित्र)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर (३ सप्टेंबर २०१३). नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. मुंबई. २१ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे