"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कुलकर्णी ' टाटा मोटर्स ' मध्ये अधिकारी होते. स्वत: मेकॅनिकल इंजिनी...
(काही फरक नाही)

२०:१९, २४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

कुलकर्णी ' टाटा मोटर्स ' मध्ये अधिकारी होते. स्वत: मेकॅनिकल इंजिनीअर असूनही त्यांनी, ऐहिक वैभवाकडे पाठ फिरवून १९९३ साली पुण्याचा निरोप घेतला. पर्यावरण जीवनशैली रुजविण्यासाठी दिलीप कुलकर्णी कुटुंबियांसह कुडावळे(ता. दापोली, जि. रत्नागिरी) या आडवळणाच्या खेड्यात जगत आहेत. ’ पर्यावरण जागृती’सह वीस पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. तसेच, कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा जगविण्याचा त्यांचा प्रयत्‍न महत्त्वाचा आहे. त्यांच्या या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

दिलीप कुलकर्णी यांचा संक्षिप्त परिचय

  • १९७८ मध्ये अभियांत्रिकीची पदविका
  • १९७८ ते १९८४ पुण्याला टेल्को कंपनीमध्ये नोकरी
  • १९८४ ते १९९३ विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे पूर्ण-वेळ काम. ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन.
  • १९९३पासून – ‘पर्यावरण’ जगण्यासाठी कोकणातील एका खेडयात सहकुटुंब स्थायिक.
  • विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, मराठी व इंग्रजीतून स्फुट-लेखन.

पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी दिलीप कुलकर्णी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक चालवतात. त्यासाठी महिन्यातले पाच दिवस पुण्यात असतात. काम संपले की पुन्हा कुडावळ्याला पर्यावरणाच्या कुशीत जातात. त्यांच्या नावावर सध्या १३पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. ' निसर्गायन ', ' ग्रीन मेसेजेस ' आदींचा त्यात समावेश आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून , कार्यशाळेमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात.

आधुनिक म्हणावे असे एकच 'उपकरण' ते वापरतात ते म्हणजे रेडिओ. स्वतःची वाहने नाहीत , अगदी स्वयंपाकाचा गॅसही नाही. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी गरजेपुरता स्वयंपाक केला जातो. रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा नित्य प्रयत्न असतो.

पुरस्कार

  • 'नातू फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा 'महादेव बळवंत नातू पुरस्कार' (२०१०). पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह.
  • २०१३ सालचा श्रीगमा पुरस्कार
  • इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णी यांचे नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त भाषण

कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

  • Green Messages
  • अणुविवेक
  • कलमी तुरा
  • चिंचा आणि बोरे
  • जगदीशचंद्र बसू
  • दैनंदिन पर्यावरण
  • निसर्गायन
  • पर्यावरण जागृती
  • विकासस्वप्न
  • वेगळ्या विकासाचे वाटाडे
  • वैदिक गणित भाग १ ते ४ (सहलेखन)
  • सम्यक विचार
  • हरितसंदेश