राणी गाइदिन्ल्यू
भारतीय क्रांतिकारक महिला | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जानेवारी २६, इ.स. १९१५ ब्रिटिश राज | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | फेब्रुवारी १७, इ.स. १९९३ मणिपूर | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
राणी गाइदिन्ल्यू (जानेवारी २६, १९१५ - फेब्रुवारी १७, १९९३) ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या. ज्यांनी भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले.
वयाच्या १३ व्या वर्षी त्या हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एका राजकीय चळवळमध्ये सामील झाल्या. १९३२ मध्ये १६ वर्षांच्या असताना गाइदिन्ल्यू यांना अटक करण्यात आली आणि त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.१९३७ मध्ये जवाहरलाल नेहरू त्यांना शिलाँग कारागारात भेटले आणि त्यांनी गाइदिन्ल्यू यांची सुटका करण्याचे वचन त्यांना दिले.नेहरूंनी त्यांना "राणी"ही पदवी दिली.[१]
१९४८ मध्ये त्या भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेल मधून सुटून आल्या.आपल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करत राहिल्या.त्यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून सन्मानित करण्यात आले आणि त्याला भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.[२]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]राणी गाइदिन्ल्यू यांचा जन्म २६ जानेवारी १९१५ साली तामंगलगोंग जिल्ह्यातील सध्याच्या तौसम उप-विभागात मणिपूरमधील नुंगका (किंवा लांबकाओ) गावात झाला. त्या रोंगमेई टोळी (सुद्धा काबुई म्हणून ओळखली जाणारी) ओळखल्या जात होत्या. लोंथोनांग पामेली आणि कच्छकलेन्ली या दांपत्यापासून जन्मलेल्या सहा बहिणी, एक धाकटा भाऊ,आणि राणी ह्या आठव्या क्रमांकावर होत्या. हे कुटुंब गावातील सत्ताधारी वंशांचे सदस्य होते.[३] एकूण आठ भावंडांत पाचवी असलेली गाइदिन्ल्यू लहानपणापासूनच अतिशय धाडसी होती. या भागात शाळा नसल्यामुळे तिचे शिक्षण होऊ शकले नाही. ब्रिटिश अधिसत्तेच्या या कालखंडात भारतभर ब्रिटिशविरोधी लढे सुरू होते. गाइदिन्ल्यूचा चुलतभाऊ हैपोऊ जादोनांग याने हेराका नावाचे धार्मिक आंदोलन सुरू केले. विशेषतः नागा लोकांच्या ख्रिश्चनीकरणास त्यांनी विरोध केला. हळूहळू हे आंदोलन सशस्त्र बनले. झेलियनग्रोंग जमातीतील लोक (झेमी, लाईंगमाय, रौंग्मी, काबुईस) या आंदोलनाकडे आकर्षित झाले. वयाच्या तेराव्या वर्षी गाइदिन्ल्यू या आंदोलनात सहभागी झाली. मणिपूर- नागालँडमधून ब्रिटिशांना बाहेर हाकलून प्राचीन नागा संस्कृतीचे पुन्नरुज्जीवन करणे या उद्देशाने जादोनांग आणि त्याचे सर्व सहकारी कार्य करत होते. ब्रिटिशांनी जादोनांगला पकडून २९ ऑगस्ट १९३१ रोजी फाशी दिली. पुढे हेराका आंदोलनाचे नेतृत्व अवघ्या सोळा वर्षांच्या गाइदिन्ल्यूकडे आले. गनिमी काव्यात, शस्त्र चालविण्यात तरबेज असलेल्या गाइदिन्ल्यूबरोबर सु. चार हजार क्रांतिकारी लोकांचे संघटन होते. जादोनांगला फाशी दिल्यानंतर नागा लोकांत असंतोष पसरला होता. त्याला ब्रिटिशविरोधाकडे वळविण्यात तिला यश मिळाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Nayyar, Kusumlata (2002). Rani Gaidinliu (इंग्रजी भाषेत). Ocean Books. ISBN 9788188322091.
- ^ Longkumer, Arkotong (2010-05-04). Reform, Identity and Narratives of Belonging: The Heraka Movement in Northeast India (इंग्रजी भाषेत). A&C Black. ISBN 9780826439703.
- ^ Trade, TI. "The Assam Tribune Online". www.assamtribune.com. 2018-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-16 रोजी पाहिले.
- ^ "राणी गाइदिन्ल्यू". मराठी विश्वकोश. १४ जून २०२५ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]