रमाई साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • १ले रमाई साहित्य संमेलन अकोला येथे २७ मे २०१२ रोजी झाले. रमाई फाउंडेशन, रमाई मासिक (स्थापना : २५-१२-२००९) व सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन भरविले गेले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्धी हिंदी साहित्यिक व दलित अस्मितेच्या संपादिका प्रा. डॉ. विमल थोरात या होत्या तर संमेलनाचे उद्‌घाटन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले.
  • २रे : ‘रमाई’ चळवळीचे २रे साहित्य संमेलन २७ मे २०१३ रोजी झाले. हे संमेलन रमाई फाउंडेशन आणि रमाई मासिकाने औरंगाबादच्या जगद्गुरू संत तुकाराम सिडको नाट्यगृहात भरविले होते. संमेलनाचे उद्‌घाटन प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्षा दलित कवयित्री हिरा बनसोडे होत्या.
  • ३रे : २७-५-२०१४; मुंबई
  • ४थे : २७-५-२०१५; वंनद गावी
  • ५वे : २७-५-२०१६;



पहा : १. मराठी साहित्य संमेलने; २. पहिले संमेलन