हिंदुस्तानी संगीत घराणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय संगीत घराणे या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये घराणे हे विशिष्ट पद्धतीने विकसित झालेल्या संगीतशैलीचे द्योतक आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनामधली किराणा, आग्रा, जयपूर-अत्रौली, ग्वाल्हेर ह्या सारखी संगीत घराणी प्रसिद्ध आहेत.

पूर्वीच्या काळी गायकांनी आपली स्वतःची अशी खास गायनशैली विकसित केली. हे गायक ज्या मूळ ठिकाणाहून आले त्या ठिकाणावरून त्या गायनशैलीला 'विशीष्ट घराण्याचे गाणे' म्हणून ओळखले जाऊ लागले. उदाहरणार्थ, जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खान ह्यांचे मूळ गांव उत्तर प्रदेशातील अलीगढजवळच्या अत्रौली हे होते. जयपूरच्या महाराजांनी राजाश्रय दिल्यामुळे ह्या घराण्याचे नाव जयपूर-अत्रौली पडले, असे जाणकार मानतात.

घराण्याच्या संगीतशैलीचा प्रसार आणि हस्तांतरण मुख्यत: हे गुरू-शिष्य परंपरेतून पुढे होत राहिले आहे.

गायन[संपादन]

वादन[संपादन]

तबला[संपादन]

नर्तन[संपादन]