दिल्लीची लढाई (१७५७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१७५७ची दिल्लीची लढाई ११ ऑगस्ट, १७५७ रोजी मराठा साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतींमध्ये लढले गेले. मराठा सैन्याचे नेतृत्त्व रघुनाथराव पेशवे तर दिल्ली सल्तनतीच्या सैन्याचे नेतृत्त्व नजीब-उद-दौला रोहिला यांच्याकडे होते.

यात मराठ्यांचा विजय होउन त्यांनी दिल्ली शहर काबीज केले.

याच्या दोनच महिने आधी जून १७५७मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने पलाशीच्या लढाईमध्ये बंगालच्या नवाब सिराज-उद-दौलाचा पराभव करून भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला होता.