दहिफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दहिफळ हे महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ८०० ते १००० असून गावातील बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती आहे. गावाजवळून गिरीजा नदी वाहते. या नदीवर कल्याण-गिरीजा मध्यम प्रकल्प नावाचे धरण आहे. या धरणामुळे आसपासचा परिसर ओलिताखाली आला आहे. या धरणातील पाणी गावाला मिळते.