चर्चा:ऋषीपंचमी
ऋषिपंचमी व्रताचे मर्म ध्यानात घेऊन बैलाच्या अथवा यंत्राच्या द्वारा निर्माण झालेल्या उत्पादनात काहीना काही स्वकष्टाने भर घालूया. निर्माण केलेला एखादा दुधी भोपळा, एकदोन वांगी, दोनचार गाजरे, किमान मूठभर कोथिंबीर, मेथीची एक पेंडी असे जे जे शक्य तेवढे स्वकष्टार्जित मिळवून त्याचा आहारात समावेश करण्याची प्रथा ऋषिपंचमीच्या व्रताशी जोडूया. ओल्या कचर्या चे खत बनवू या. यशवंत शंकर लेले (चर्चा)