गीता हरवंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गीता आदिनाथ हरवंदे या एक मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे प्रवासवर्णने लिहितात.[ संदर्भ हवा ] त्यांनी भारतातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत. श्रीकृष्णाचे जिथेजिथे वास्तव्य होते त्या सर्व ठिकाणांची माहिती देणारे त्यांचे ’श्रीकृष्ण स्थलयात्रा’ हे लिहिले आहे. यात आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आदी नऊ राज्यांतील ठिकाणे आहेत.[ संदर्भ हवा ] या राज्यांतील ठिकाणे आणि तेथील सध्याची स्थिती या पुस्तकात वर्णन करून सांगितली आहे.[ संदर्भ हवा ]

हरवंदे या भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या आहेत. त्यांना वाचायला, अभ्यास करायला फक्त शाळेत परवानगी होती. शाळेतून घरी आल्याबरोबर प्रथम साठलेले घरकाम करायचे आणि नंतर आईने शिवून ठेवलेल्या कपड्यांना काज-बटण-हातशिलाई करायची हे त्यांचे काम असे. त्या शिवडीच्या कबरस्थानातील हौदावरचे पाणी भरून घरी आणीत.[ संदर्भ हवा ]

हरवंदे यांना त्या इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने बक्षीस म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले. याशिवाय त्यांना इतर चार-पाच पुस्तके बक्षीस म्हणून मिळाली होती.[ संदर्भ हवा ] ती पुस्तके त्यांनी मोठेपणी वाचली.

पुस्तके[संपादन]

संदर्भ[संपादन]