कुलमुखत्यार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुलमुखत्यार हे पद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले होते. महाराजांनी त्यांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून हे पद निर्माण केले होते. ज्या व्यक्तीकडे हे पद असतं त्या व्यक्तीकडे शिक्के कट्यार असते. राजमाता जिजाबाई ह्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या आणि त्यांच्यानंतर महाराणी येसूबाई यांना शिवरायांनी कुलमुखत्यार पदाची जबाबदारी दिली. त्यांच्यानंतर हे पद कोणाकडे होते याबद्दल माहिती आढळत नाही.[ संदर्भ हवा ]