वैष्णव जन तो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैष्णव जन तो हे एक प्रसिद्ध गुजराती हिंदू भजन आहे , कवी नरसी मेहता यांनी इसवी सनाच्या पंधराव्या शतकात ते लिहिले .[१]
हे भजन गुजराती भाषेत लिहिले गेले आहे. हे भजन वैष्णव जनांचे (विष्णू देवाचे उपासक व पूजक यांचे) गुण व त्यांची लक्षणे सांगते .

विष्णू आणि लक्ष्मी यांचे चित्र


प्रसार[संपादन]

महात्मा गांधी यांचे देशकार्य

ह्या भजनाचा समावेश महात्मा गांधींच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये असल्याने हे भजन लोकप्रिय झाले आहे. महात्मा गांधी यांनी अंगिकारलेल्या जीवन आणि कार्य तत्त्वज्ञानाचे वर्णन या भजनात आहे.[२] त्यामुळे महात्मा गांधी यांच्या राष्ट्रकार्याचे स्मरण करताना या भजनाचा समावेश केला जातो.

गीतिकाव्य[संपादन]

मूळ गुजराती देवनागरी

વૈષ્ણવ જન તો તેને કહિયે, જે પીડ પરાયી જાણે રે
વૈષ્ણવ જન તો તેને કહિયે, જે પીડ પરાયી જાણે રે

પર દુ:ખે ઉપકાર કરે તોયે, મન અભિમાન ન આણે રે
વૈષ્ણવ જન તો તેને કહિયે, જે પીડ પરાયી જાણે રે

સકળ લોકમાં સહુને વંદે, નિંદા ન કરે કેની રે
વાચ કાછ મન નિશ્છળ રાખે ધન ધન જનની તેની રે
વૈષ્ણવ જન તો તેને કહિયે, જે પીડ પરાયી જાણે રે

સમ દૃષ્ટિ ને તૃષ્ણા ત્યાગી પરસ્ત્રી જેને માત રે
જિહ્વા થકી અસત્ય ન બોલે પરધન નવ ઝાલે હાથ રે
વૈષ્ણવ જન તો તેને કહિયે, જે પીડ પરાયી જાણે રે

મોહ માયા વ્યાપે નહિ જેને દૃઢ વૈરાગ્ય જેના મનમાં રે
રામ નામ શુ તાળી રે લાગી સકળ તીરથ તેના તનમાં રે
વૈષ્ણવ જન તો તેને કહિયે, જે પીડ પરાયી જાણે રે

વણ લોભી ને કપટ રહિત છે, કામ ક્રોધ નિવાર્યાં રે
ભણે નરસૈયો તેનું દર્શન કરતાં કુળ એકોતેર તાર્યાં રે
વૈષ્ણવ જન તો તેને કહિયે, જે પીડ પરાયી જાણે રે

वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे,
पर दुःखे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे ॥

सकल लोकमां सहुने वंदे निंदा न करे केनी रे,
वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे ॥

समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे,
जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ॥

मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे,
रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे ॥

वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवाऱ्या रे,
भणे नरसैयॊ तेनु दरसन करतां, कूल एकोतेर ताऱ्या रे ॥

मराठी भाषांतर[संपादन]

मूळ काव्य (देवनागरीत) मराठी (भाषांतरित)
वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे, वैष्णव जन त्यांना म्हणावे जे परकियांच्या पिडा जाणतात
पर दुःखे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे ॥ जे दुसऱ्यांचे दुःख दूर करून देखील अभिमान मनात आणत नाही
सकल लोकमां सहुने वंदे निंदा न करे केनी रे, जे लोकांना (जनमानसांना ) वंदितात आणि कुणाची ही निंदा करीत नाहीत
वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे ॥ वचन , कर्म , मन जे निश्चल राखतात , त्यांची जननी धन्य धन्य आहे
समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे, तृष्णा (लोभ) त्यागून जे सर्वांना समभावाने बघतात , पर-स्त्री ज्यांना माते समान (आई) आहे
जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ॥ जिह्वा (जीभ ) थकली तरी जे असत्य बोलत नाहीत , परधनास (दुसऱ्यांच्या धनास ) जे स्पर्श करत नाहीत
मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे, मोह माया ज्यांना व्यापत नाही , दृढ वैराग्य ज्यांच्या मनात आहे
रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे ॥ राम-नामामध्ये जे तल्लीन आहेत ,जणू तीर्थ ज्यांच्या तनात (शरीरात) वसले आहे
वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवाऱ्या रे, लोभापासून दूर होऊन कपटरहित ज्यांनी ,काम-क्रोधाचे निवारण केले आहे
भणे नरसैयॊ तेनु दरसन करतां, कूल एकोतेर ताऱ्या रे ॥ कवी नरसिंह अशा लोकांचे (वैष्णवांचे) दर्शन घेण्यासाठी अभिलाषी आहे , जे एकूण कुळाचे तारण करतात (मोक्ष मिळवून देतात)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Verma, Shyam Bahadur (2009-01-01). Brhat Visva Sukti Kosa-III (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-170-5.
  2. ^ Gandhi, Mahatma (2016). Merī ātmakathā: satya ke mere prayoga (हिंदी भाषेत). Kalpanā Prakāśana. ISBN 978-93-83725-83-0.