उग्रश्रव सौती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Ugrashravas narrating Mahābhārata before the sages gathered in Naimisha Forest.jpg

उग्रश्रव सौती हा महाभारताचा सूत्रधार आहे. सौती एक सूतपुत्र ब्राम्हण होता. त्यांच्या वडिलांचे नाव लोमहर्षण. महाभारताची सुरुवात उग्रश्रवाच्या नैमिशारण्यात येण्याने होते. त्यानंतरचे संपूर्ण महाकाव्य उग्रश्रवाने शौनक या ब्राम्हण ऋषीस व शौनकाच्या गुरुकुलातील इतर ऋषींना सांगितले असे महाभारताचे स्वरूप आहे.