जितेंद्र उधमपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. जितेंद्र उधमपुरी (इ.स. १९४४:उधमपूरजवळ, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे एक बहुमुखी प्रतिभेचे काश्मिरी लेखक व कवी आहेत.

उधमपुरींचे शिक्षण लहान खेड्यात झाले. गांधी मेमोरियल कॉलेज येथून त्यांनी इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले व डोगरी भाषेवर डॉक्टरेट केली.

कारकीर्द[संपादन]

डॉ. जितेंद्र उधमपुरी हे सुरुवातीला लष्करात नोकरीला होते. तेथे काही काळ काम केल्यानंतर ते आकाशवाणीत रुजू झाले. त्यांनी ३० वर्षे आकाशवाणीमध्ये सेवा केली व वरिष्ठ संचालक म्हणून निवृत्ती घेतली.

विविध भाषांत लेखन[संपादन]

उधमपुरी यांना डोगरी, हिंदी, उर्दू, पंजाबी, या भाषा अवगत असून या भाषांत त्यांनी ३० पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे इंग्लिश, नेपाळी व चेक भाषांत अनुवाद झाले आहेत. 'The History of Dogri Literature' and 'The History of Dogra Culture' ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत..

काव्यलेखन[संपादन]

जितेंद्र उधमपुरी हे आधुनिक डोगरी कवितेचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कवितांच्या शैलीत अनेक प्रयोग केले आहेत.

डॉ. जितेंद्र उधमपुरी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • जित्तो
  • दीवाने गज़ल
  • डुग्गरनामा
  • गीतगंगा, वगैरे

पुरस्कार[संपादन]

  • डॉ. जितेंद्र उधमपुरी यांना २०१५ सालचा अडीच लाख रुपयांचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.