"ब्रह्मानंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३०: ओळ ३०:
* अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा येथे १८-१९ डिसेंबर २००९ दरम्यान झालेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या १८ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद ब्रह्मानंद देशपांडे यांनी भूषविले होते.
* अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा येथे १८-१९ डिसेंबर २००९ दरम्यान झालेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या १८ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद ब्रह्मानंद देशपांडे यांनी भूषविले होते.
* त्यांच्या ‘देवगिरीचे यादव’ या पुस्तकाला राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
* त्यांच्या ‘देवगिरीचे यादव’ या पुस्तकाला राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
* त्यांच्या ‘रत्नमाला स्तोत्र’ या ग्रंथाला महानुभाव विश्वभारती पुरस्कार मिळाला आहे.
* त्यांच्या ‘रत्‍नमाला स्तोत्र’ या ग्रंथाला महानुभाव विश्वभारती पुरस्कार मिळाला आहे.
* दिवाकर रावते भूमिपुत्र पुरस्कार
* दिवाकर रावते भूमिपुत्र पुरस्कार
* संत साहित्य संशोधन पुरस्कार
* संत साहित्य संशोधन पुरस्कार

००:१३, २६ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडे (जन्म : १९४०; मृत्यू : पुणे, ६ ऑगस्ट, २०१३) हे एक मराठी इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते आणि महानुभाव पंथाचे अभ्यासक होते.

ब्रह्मानंद देशपांडे हे मूळचे वाशीम जिल्ह्यातले. मराठवाडय़ातील एक ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या देशपांडे यांचे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण नागपूर आणि मध्यप्रदेशातील सागर येथे झाले. महाराष्ट्रातील शिलालेख - ताम्रपटांचा अभ्यास करून नागपूर विद्यापीठातून आधुनिक इतिहास या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट संपादन केली होती.

ते पैठण, औरंगाबाद आणि नागपूर येथील महाविद्यालयांत इतिहास हा विषय शिकवत होते. त्यांनी औरंगाबाद येथील सरस्वती महाविद्यालयात सलग ३१ वर्षे अध्यापनाचे काम केले. शिक्षणाबरोबरच इतिहास संशोधनात उतरलेल्या देशपांडे यांनी पुढे महाराष्ट्रातील सातवाहनापासून ते मराठ्यांच्या कालखंडांचा मोठा अभ्यास केला. या बरोबरच अजिंठा-वेरूळची लेणी, पैठण, सातवाहन समाज, महानुभाव पंथ, संतवाङ्‌मय, कवी भूषण हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते.

मराठी, हिंदी, इंग्रजीशिवाय संस्कृत, गुजराथी, कन्नड, बंगाली, उर्दू अशा दहाहून अधिक भाषांवर देशपांडे यांचे प्रभुत्व होते. महाराष्ट्रातील बहुतांश बोलीभाषा त्यांना अवगत होत्या. ब्राह्मी, फारसी, मोडी लिपीचे ते तज्ज्ञ होते.

ब्रह्मानंद देशपांडे यांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय परिषदांमधून दीडशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. शेकडो लेख, स्मरणिकांचे संपादन व प्रकल्पांमधील सहभाग त्यांच्या नावावर जमा आहेत.

नागपूर विद्यापीठाशी आणि मराठवाडा विद्यापीठाशी त्यांचा जवळचा संबंध होता. खानदेश इतिहास परिषद आणि कर्नाळा दुर्ग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ, मराठावाडा साहित्य परिषद, नटनागर शोधसंस्थान (मध्यप्रदेश), यक्षायतम प्रतिष्ठान, अखिल महानुभाव परिषद, हिंद-उर्दू सोसायटी, छत्तीसगड शोधसंस्थान आदी संस्थांशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. त्यांनी त्यांच्याकडील ग्रंथसंपदा आणि दुर्मीळ वस्तू भारत इतिहास संशोधक मंडळाला देणगी म्हणून बहाल केल्या होत्या.

महानुभाव या मासिकाचे ते कार्यकारी संपादक होते.


देशपांडे यांचे ३४ संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतल्या काहींची ही नावे :-

  • इये नाथांचिये नगरी
  • चक्रपाणी-चिंतन
  • दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ते ४
  • देवगिरीचे यादव
  • रत्‍नमाला स्तोत्र
  • रत्‍नशाळा पूर्वार्ध
  • शब्दवेध
  • शोधमुद्रा खंड १ ते ४
  • सप्तपर्णी
  • लीळाचरित्र एकांक, वगैरे

ब्रह्मानंद देशपांडे यांना मिळालेले सन्मान

  • अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा येथे १८-१९ डिसेंबर २००९ दरम्यान झालेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या १८ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद ब्रह्मानंद देशपांडे यांनी भूषविले होते.
  • त्यांच्या ‘देवगिरीचे यादव’ या पुस्तकाला राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
  • त्यांच्या ‘रत्‍नमाला स्तोत्र’ या ग्रंथाला महानुभाव विश्वभारती पुरस्कार मिळाला आहे.
  • दिवाकर रावते भूमिपुत्र पुरस्कार
  • संत साहित्य संशोधन पुरस्कार
  • उत्तर भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे महामहोपाध्याय ही पदवी