Jump to content

सदस्य:Jaydeep Jagannath Thakur

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोमवंशी क्षत्रिय (वाडवळ)

शके १०६२ च्या सुमारास चंपानेरच्या प्रताप बिंबाने उत्तर कोकणावर स्वारी करून उत्तर कोकण हस्तगत केले आणि सोमवंशी क्षत्रियांचा वा भागात प्रवेश झाला. या नविन परंतु ओसाड व उद्धस्त स्थितीत असलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी राजा प्रताप बिंबाने चांपानेर व पैठण वेचून जी ६६ कुळे आणली. त्यात २७ कुळे सोमवंशी १२ कुळे सूर्यवंशी आणि ९ कुळे शेषवंशी होती. सोमवंशी क्षत्रिय ज्यावेळी कोकणात आले त्यावेळी त्यांची सामाजिक प्रतिष्ठा पुष्कळच मोठी असावी. धार्मिक दृष्टना त्यांचे काही कुलाचार होते त्यांच्या विशिष्ट कुलदेवता होत्या. त्यांची गोत्र प्रवरे होती.