सदस्य:Arati salunkhe/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यशवंत(भुईकोट) किल्ला

कागल चा हा किल्ला प्राचीन आहे. या किल्ल्याने चालुक्य ,राष्ट्रकूट, शिलाहार, यादव व मराठी आणि इंग्रजांची राजवट पाहिली आहे. रक्षणाकरिता यांनी आपल्यावर असंख्य हा घात सोसले आहेत. प्रामुख्याने कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई व कोल्हापूरचे छत्रपती शाहू ऊर्फ बुवा महाराज यांच्या काळात मात्र या किल्ल्यावर मोठा प्रसंग आला. पेशवे दरबाराच्या फुशीवरून कागलकर, बावडेकर, इंचलकरंजीकर, सावंतवाडीकर, यांनी आपली संस्थाने स्वतंत्र रीत्या आहेत असे जाहीर करून कोल्हापूर छत्रपती विरुद्ध उठाव केला, तो उठाव मोडून काढण्यासाठी छत्रपती नाही त्यांच्या विरुद्ध जोरदार उठावा करावा लागला. फौजदारी कोल्हापूरकरांचे कारभारी यशवंतराव शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी होत्या धडाडीने या सर्व ठिकाणचे उठाव मोडून काढले आणि किल्ले ताब्यात घेतले या उठावात त्यांनी अठराशे सालीचा हा किल्ला उध्वस्त करून टाकला. अंतर्गत बेबंदशाही च्या फायदा पेशव्यांस बरोबरच कोल्हापूरचे राज्य गिळंकृत करण्याकरिता टपलेल्या इंग्रजांनी घेतला. पुढच्या छत्रपतींच्या राज्यातील स्थानिकांचा कटकटी हो पण याकरिता इंग्रजांना किल्ल्या बरोबरच लष्करी तळ ही निर्माण करण्याची संधी मिळाली आणि त्यांना आपली कोल्हापूर वरील पकडही घट्ट करता आली. यशवंतरावांच्या स्वारीने उध्वस्त झालेला हा किल्ला ज्यांनी कागल येथील गई तालुक्यातील तूर्बत व भोवतालचा दगडी चौथरा व मच्छिद नगरखाना वगैरे बांधून दिला प्रसिद्ध सखाराम घाडगे यांचे चिरंजीव यांचे नाव येथील मराठी शाळा व वेस ज्यांचे नावे आहे ते हिंदुराव घाडगे यांनी या प्रसिद्ध किल्ल्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला. या किल्ल्याचे एकंदर क्षेत्र सात एकर नऊ गुंठे आहे पश्चिम लांबी 318 फूट उत्तर-दक्षिण रुंदी 366 फूट व उंची 50 फुटावर होती. वाजत बुरुज शिवाय दक्षिण गटाच्या मध्यात एक खास चोर वाटेचा बुरुज असे पाच बुरूज होते. या 5 बुर्जाना वेगवेगळी नावे होती. उत्तरेच्या तटाच्या मध्यभागी प्रवेश करण्याचा मुख्य दरवाजा होता. आता दक्षिण तटाजवळ एक मोठी विहीर होती तटाला लागून धन-धान्य व शस्त्र साहित्य सैनिक व कैदी यांच्यासाठी खास खास कोठल्या होत्या. शिवाय मारुती यांची लहान देवळे होती. आतील भागातून पडण्याकरिता अखंड पाहिल्या होत्या मुलाच्या आतही अशा छोट्या वाट्या होत्या. सर्वच बुरुजावरून तोफखान्याची व टेहळणी ची ती बाहेरील खंदकटी पाण्याने भरलेले असतात. या खंदकाच्या बाहेरून ही सर्व बाजूंनी मोठी संरक्षक तट होती. नगर परिषदेच्या ताब्यात दिनांक 4 एप्रिल 1959 रोजी आला. इंग्रजांनी किल्ल्याच्या पूर्व बाजूची भक्कम तटबंदी खास तोफा लावून पाडली व मोठा प्रवेशद्वारच केला होता. या किल्ल्याने एकाही तत्कालीन शत्रूशी झुंज देऊन कागलचे रक्षण केले तीच रक्षण करता उरला नाही. महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागीय अधिनियमानुसार पन्नास वर्षांपूर्वीच्या सर्व इमारती पुरातन ठरविण्यात आल्या आहेत. वर लष्कराने व विद्यार्थिनी श्रमदान करून देवती क्रीडांगण, गुरांचे बाजार, शेतीची प्रदर्शने भरली आहेत. अनेक कुस्त्यांची मैदाने गाजली. हे मार्फत नोकरांची वस्तीत साने उत्कृष्ट क्रीडांगणे व भगेच्या होणार होता. हे एक ओपन थेटर होणार होते. खास यासाठी शासनाने ही जागा नगरपालिकेत बहाल केली होती. त्याचे उरलेसुरले अवशेषही ' तोच मी यशवंत किल्ला!' म्हणून साक्ष देत आहेत. पूर्वीचा यशवंत किल्ला जरी नामशेष झाला तरी नगरपरिषदेने, कुस्ती मैदान, पार्क, सभागृह बांधले आहे. यशवंत किल्ला हा जरी वस्तू रुपात नसला तरी आज अम्युझमेंट पार्क आहे त्यामुळे तिथे लहान मुलांची गर्दी असते, तसेच कुस्ती हा कोल्हापूर वासियांचा आवडता खेळ आहेत आणि कुस्ती ही कोल्हापूरची शान आहे त्यामुळे कागल चा उरूस असतो त्यावेळी कुस्ती हा खेळ आयोजित केलेला असतो त्यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटू येथे आपला खेळ दाखवण्यासाठी येत असतात व तो बघण्यासाठी महाराष्ट्रातून कुस्तीचे शोकिन चाहते येतात. सभागृहामध्ये राजकीय सामाजिक उपक्रम होत असतात. त्यामुळे जरी आता येथे यशवंत किल्ला नसला तरी बाबींमुळे तेथे लोकांची रेलचेल आहे. नगरपरिषदेने येथे नवनवीन उपक्रम राबवले आहेत.