सदस्य:अमोल नानासाहेब साबळे/२०ऑगस्ट कार्यशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बळवंत लिमये (१८८०-१९६१)हे स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवासाची शिक्षा झालेले सोलापूरमधील पहिले पत्रकार होते.'गजनफर' कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन् यांचे प्रेरक,लोकमान्य टिळकांचे सच्चे अनुयायी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेची ज्यांनी दीक्षा घेतली होती, सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाची छपाई करण्याचा धोका पत्करून छपाईला सोलापुरात ज्यांनी प्रारंभ केला होता ते बळवंत लिमये हे अल्पकाळ जगलेल्या 'स्वराज्य' साप्ताहिकाचे संपादक होते. बळवंत लिमये यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील ईंडी तालुक्यातील भतकूणकी गावात वतनदार घराण्यात १८८० साली झाला.

त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये,तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गुसन कॉलेजमध्ये झाले. लाठी,दांडपट्टा फिरवणे आणि कुस्ती अशा मर्दानी खेळांची त्यांना विशेष आवड होती. १९०४ साली बी.ए झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरवात केली. गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव साजरा करण्यात ते रस घेऊ लागले.त्यांची लोकमान्य टीळकांशी ओळख त्यांचा आतेभाऊ अप्पासाहेब फाटक यांच्यामुळे झाली.लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय विचारसरणीची छाप त्यांच्यावर पडल्यामुळे ते राजकीय चळवळीत रमू लागले.लोकमान्य टिळका बरोबर त्यांचा वैक्तिक परिचय हि वाढू लागला. टिळकांनी लिमये यांची निर्भयता आणि धडाडी पाहुन त्यांना राष्ट्रीय कार्याच्या उत्तेजनार्थ वृत्तपत्रांची गरज आहे असं सांगून 'स्वराज्य' साप्ताहिक काढण्यास उत्तेजन दिले. १९०७ साली चैत्र शुद्ध प्रतिपदेला राष्ट्रीय बाण्याचे,तडफदार आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे 'स्वराज्य' हे साप्ताहिक बळवंतराव लिमये यांच्या संपाद्कत्वाखाली सोलापुरातून सुरु झालं. सायन्ना नरसू गानला यांच्या दत्तप्रसाद छापखान्यात ते छापला जाई.

संदर्भ[संपादन]