शैला लोहिया
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. (जन्म : धुळे,इ.स.१९४०; - अंबाजोगाई २४ जुलै२०१३). या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेवून राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजाऊन देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. त्यांचे लग्न १९६२साली डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी झाले. त्यांच्या अंबाजोगाई येथील घराचे नावच ’किनारा’ होते. डॉ.शैला लोहिया यांचे लोकभाषा अहिराणीवर प्रभुत्व होते.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
लग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईयेथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात इ.स. १९७०पासून मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना 'भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.
चौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसह पाच विदेशी महिला परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले प्रबंध सादर केले होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्यांचा आग्रह धरला.
शैला लोहिया यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी १९६३ व १९७५ दरम्यान काम केले. याच काळात भुलाबाईची गाणी, भोंडल्याची गाणी आणि लोकसाहित्यातील अनेक रचनांचा संग्रह शैलाबाईंनी केला. त्यांनी १९७३ च्या सुमारास अंबाजोगाईत ५० मुलामुलींचा एक सांस्कृतिक गट स्थापन केला, आणि राष्ट्र सेवा दलाच्या त्या पथकाचे मनोरंजक आणि बोधप्रद कार्यक्रम शैलाबाईंनी गावोगावी सादर केले. कार्यक्रमात एक वगनाट्य आणि त्यानंतर प्रबोधनपर रचना सादर केल्या जात. लोकरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना त्यांनी बीड, लातूर आदी भागात राबवली.
समाजकार्य
[संपादन]- 'भारत जोडो’ या चळवळीत सहभाग (१९८४-८५)
- आंतरराजीय विवाहांना सक्रिय पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक तितकी समजावणी
- कौटुंबिक ताणतणावांत समुपदेशन करण्याचे कार्य
- घरातच कार्यालय असलेल्या ’मानवलोक’ संस्थेची उभारणी (इ.स.१९८२)
- 'मनस्विनी’ आणि ’धडपड’ याही संस्था उभारल्या.(इ.स.१९८४). 'मनस्विनी’तर्फे गृहपदार्थांची निर्मिती आणि 'धडपड’तर्फे पापड
बनविण्याचा व्यवसाय अंबाजोगाईच्या स्त्रिया आजही व्यवस्थित सांभाळत आहेत.
- 'युक्रांद-संघर्ष वाहिनी’, 'राष्ट्र सेवा दल’, 'दलित युवक आघाडी’ या सर्वच संस्थांमध्ये सहभाग
- १९६७मध्ये 'अभाविप’च्या विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या युवक काँग्रेसच्या टग्यांविरुद्ध काढलेला मोर्चा.
- डॉ.लोहिया यांच्याकडे १२ अनाथ मुलांचे पालकत्व होते.
डॉ शैला लोहिया यांची ग्रंथरचना
[संपादन]कादंबऱ्या
[संपादन]कथासंग्रह
[संपादन]कविता संग्रह
[संपादन]अन्य ललित वाङ्मय
[संपादन]शैला लोहिया यांची पुस्तके ऑनलाईन वाचण्यासाठी
[संपादन]संशोधन / समीक्षा ग्रंथ
[संपादन]स्फुट लेखन
[संपादन]- स्थानिक ते मुंबई-पुण्यापर्यंतच्या वृत्तपत्रांतून कसदार स्फुट लेखन, वगैरे.
पुरस्कार
[संपादन]- डॉ. शैला लोहिया यांना किमान १२ राज्य आणि राष्ट्र पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.
- एक राष्ट्रीय पुरस्कार 'जगावेगळा संसार’ या पुस्तकाला १९८२साली मिळाला आहे.
- २०१० साली त्यांना अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचा साहित्य पुरस्कार मिळाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
