सर इग्नेशियस व्हॅलेंटाईन चिरोल (२८ मे १८५२ - २२ऑक्टोबर १९२९) हे एक ब्रिटिश पत्रकार, लेखक, इतिहासकार आणि मुत्सद्दी होते.
चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या पुस्तकातील निंदनीय टिप्पण्यांमुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळक यांनी लंडनमध्ये त्यांच्यावर दिवाणी खटला दाखल केला. चिरोल यांनी टिळकांनी "भारतीय अशांततेचे जनक" म्हटले होते. शेवटी टिळक हे खटला हरले असले तरीही चिरोल यांना जवळजवळ दोन वर्षे भारतात घालवली, ज्यामुळे चिरोल यांनी पहिल्या महायुद्धाचा मोठा भाग गमावला.[१]