"संभाजी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
* दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गंगाधर बनबरे हे होते.
* दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गंगाधर बनबरे हे होते.
* तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इतिहास संशोधक अनंत दारवटकर हे होते.
* तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इतिहास संशोधक अनंत दारवटकर हे होते.
* राज्यस्तरीय ९वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे २६ ऑक्टोबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष साहित्यिक शरद गोरे होते.
* ७वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन नारायणपूर (ता. पुरंदर) येथे १२ मार्च २०१६ रोजी झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार श्रीराम पचिन्द्रे होते.
* ९वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे २६ ऑक्टोबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष साहित्यिक शरद गोरे होते.





२१:३८, २२ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्‌गुरु संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २००८सालापासून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठावरील सासवड येथे होते. संमेलनाची संकल्पना पत्रकार व कवी दशरथ यादव यांची असून, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे या संभाजी साहित्य संमेलनासाठीचे मार्गदर्शक आहेत. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त दशरथ यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर आहेत, तर तालुकाध्यक्ष प्रा. केशव काकडे हे संयोजक आहेत. संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, बुधभूषण, सातशतक हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या नावाने सुरू झालेले हे महाराष्ट्रातील एकुलते एक संमेलन आहे.

१२ मार्च २०१० सालापासून हे संमेलन होते.

  • पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर ताकवले होते. छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.
  • दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गंगाधर बनबरे हे होते.
  • तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इतिहास संशोधक अनंत दारवटकर हे होते.
  • ७वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन नारायणपूर (ता. पुरंदर) येथे १२ मार्च २०१६ रोजी झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीराम पचिन्द्रे होते.
  • ९वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे २६ ऑक्टोबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष साहित्यिक शरद गोरे होते.


सन २०१३चे संभाजी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२मार्च २०१३ रोजी सासवडला झाले.

या संमेलनात सामाजिक कार्याबद्दल बार्शी तालुक्यातील राजेंद्र मिरगणे यांना छत्रपती संभाजी महाराज समाज पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, माढा येथील गोरक्षनाथ भांगे यांना युवा भूषण, कळंब येथील सौ. साधना बागरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामाबद्दल पुरस्कार, मंजुषा काटकर यांना नाट्यकलेसाठी सामाजिक गौरव, पूजा कला केंद्रातील नृत्यांगना रेणुका ढगे यांना युवती नृत्यांगना पुरस्कार, अशोक नावले यांना सामाजिक युवा गौरव, पाटस (ता. दौंड) येथील नवनाथ कुरुमकर यांना सामाजिक गौरव, पॅरामेडिकल असोसिएशनचे डॉ. अरविंद पंडित खरात यांना समाज गौरव, शांताराम पातंगे यांना युवा उद्योग रत्‍न, कृष्णकांत कोबल यांना पत्रकारिता, चिळली (ता. मोहोळ) येथील ज्ञानदेव यादव यांना जीवन गौरव, दिलीप शिंदे यांना आदर्श शिक्षक, विक्रम सावंत यांना समाजरत्न, भारती सावंत यांना माता जिजाऊ पुरस्कार, जालना येथील किसनराव मोरे यांना सामाजिक कार्यगौरव, बिपीन नाईक यांना शिक्षण रत्‍न आदी पुरस्कारांनी सन्‍मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना प्रवीणदादा गायकवाड म्‍हणाले, "आपल्या देशाच्या वैशिष्ट्यामध्ये आपणास जिवंतपणी काहीच मिळत नाही. खेडेकर साहेबांनी साहित्य चळवळ उभी केली आहे. साहित्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. ब्राह्मण हे आमचे शत्रू नसून काहींनी सांस्कृतिक शोषण केले. त्रस्तपणे आपली बाजू मांडणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक असल्याचे चित्रसमोर आले आणि त्यांच्या हातात तलवारीऐवजी पुस्तक पाहून काहीजणांच्या मनात चीड निर्माण होऊ लागली. काही ब्राम्हणांनी काही पात्रे जाणीवपूर्वक निर्माण करुन साहित्य व इतर मार्गाने लोकांमध्ये सत्य असल्यासारखी रुजवली व तोच खरा इतिहास असल्याचे लोक समजू लागले. सांस्कृतिक इतिहास हा ब्राह्मणी आणि विद्रोही अशा दोन विभागात विभागला गेला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत विद्रोही तुकाराम या विषयावर चर्चासत्र झाले त्यात विद्रोह हे बंड असल्याची जाणीव करून देण्यात आली. मराठी साहित्य समेलन आणि मराठी साहित्य परिषद ह्या दोन्ही बरोबरीने चालत असतांना चिपळूणला परशुरामाच्या छायाचित्रावरून वाद झाला. काही लोक जाणीवपूर्वक दुफळी निर्माण करत असून ज्यांच्या छायाचित्राचा अन् साहित्य संमेलनाचा अर्था संबंध नाही त्यांनी अशा प्रकारचे कृत्य हे जाणीवपूर्वक केले होते. प्रत्येक जातीधर्माच्या देव आणि प्रेरणा या भिन्न असू शकतात त्या इतरांवर लादणे योग्य नाही. मराठीच्या बाबत बोली भाषेतील मराठी आणि प्रमाणभूत मराठीमध्ये मोठी तफावत आहे. ९५ टक्के लोक जे भाषा वापरतात त्याला आधारभूत भाषेचा अथवा प्रमाणभूत दर्जा देणे आवश्यक आहे. आपल्याला सांस्कृतिक इतिहास माहीत नसल्याने अक्षय तृतीया या परशुरामाच्या जयंती दिवशी आपण सण साजरे करतो. साहित्य आपले असावे, महात्‍मा फुलेंच्या साहित्यात ग्रामर कच्चे असल्याची टीका चिपळूणकरांनी केली. परंतु लोकांनी त्या साहित्यालाच साहित्य म्हटले व तेच आज बहुजनांचे साहित्य आहे. कुसूमाग्रज कोण आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी मराठी दिन का साजरा करायचा त्यांनी काय साहित्य निर्माण केले केवळ एक कविता करून मराठीचा वाली होत नाही. त्यांच्यापेक्षा महान साहित्य निर्मिती करणारे आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिवशी मराठी दिन साजरा का केला जात नाही. दीड दिवसांची शाळा करुनही मोठ्या साहित्याची निर्मिती करणारे आण्णाभाऊ हेच खरे साहित्यिक आहेत. एकाही मराठ्यास उवा बहुजनांस भारतरत्‍न का दिला जात नाही?, मराठीवर राजकारण करण्यापेक्षा मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी अथवा वाढीसाठी प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. "