"महेश भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महेश मुरलीधर भागवत (जन्म : पाथर्डी-अहमदनगर जिल्हा, १७ जून, १९६९) हे...
(काही फरक नाही)

१३:३४, २ जुलै २०१७ ची आवृत्ती

महेश मुरलीधर भागवत (जन्म : पाथर्डी-अहमदनगर जिल्हा, १७ जून, १९६९) हे एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. आयपीएस झालेल्या भागवतांची ५-९-२००६ रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर ते मणिपूर-त्रिपुरा केडरमधून आंध्र प्रदेश केडरमध्ये आले. १ जुलै २०१६पासून ते सायबराबाद (हैदराबाद-राचकोंडा)चे पोलीस आयुक्त आहेत.

नक्षलवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केलेली धडपड

आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात काम करीत असताना ‘पीपल्स वॉर ग्रुप’च्या नक्षलवाद्यांनी सिरपूर-कागजनगरचे आमदार आणि त्यांच्या चार अंगरक्षकांची हत्या केली. नक्षल्यवाद्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे भागवत यांच्या लक्षात आले. त्यांनी पाठिंब्यामागची कारणे शोधून काढली आणि नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारा ‘अज्ञातम्‌ स्वेच्छा’ हा प्रकल्प राबविला. पोलिस आणि नागरिकांमधील समन्वयासाठी ‘मैत्री संघम्‌’ निर्माण केला. ‘मी कोसम’ या उपक्रमाद्वारे ‘कम्युनिटी पोलिसिंग’चे त्यांनी उत्तम उदाहरण घालून दिले.

स्त्रियांच्या व्यापाराचे रॅकेट उघडकीला आणले

आंध्र प्रदेशातील नलगोंडाचे पोलीस अधीक्षक असताना यादगिरीगुट्टा येथील मानवी व्यापाराचे मोठे रॅकेट त्यांनी उघडकीस आणले. अडीचशे जणांना अटक केली. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांची सुटका केली. पीडितांची सुटका झाली आणि जबाबदारी संपली, असा विचार त्यांनी केला नाही. पीडित स्त्रियांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. उदबत्त्या, भांडी निर्मितीचे, शिवणकामाचे शिक्षण दिले. या महिलांच्या मुलींच्या नशिबी वेश्याव्यवसायातले जीवन येऊ नये म्हणून सात ते पंधरा वयोगटातील मुलींना त्यांनी शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली. प्रशासकीय अधिकारांचा कौशल्यपूर्ण वापर आणि अशासकीय संस्थांची मदत घेत त्यांनी शेकडो मुले, महिला, युवतींची नरकयातनांतून सुटका केली आहे.


वग:आअठी व्यक्ती]