"इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी ही एक चिटफंड कंपनी आहे. राजेश दिनकर कांब...
(काही फरक नाही)

१५:००, २० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी ही एक चिटफंड कंपनी आहे.

राजेश दिनकर कांबळे आणि पत्‍नी विद्या कांबळे यांनी साथीदार अजय माधव प्रभुदेसाई आणि अमोल चंद्रकांत शहा यांच्या मदतीने पुण्यातील कोंढवा परिसरात ही ‘इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी’ नावाची कंपनी सुरू केली. कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला गुंतवलेल्या रकमेवर पाच टक्के अधिक परतावा मिळेल, असे नागरिकांना आमिष दाखविले. त्यानुसार कोंढवा परिसरासह शहरातील २५० ते ३०० नागरिकांकडून त्यांनी कोट्यवधी रुपये घेतले. ग्राहकांना विश्वास बसण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला त्यांना परतावा दिला. मात्र, गुंतवणुकदारांची संख्या वाढल्यावर परतावा देण्यास नकार देऊन आरोपी पळून गेले.

इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी या कंपनीने गुंतवणूकदारांच्या केलेल्या कोट्यवधी रुपयांची फसवणुकीबद्दल करणार्‍या अजय प्रभुदेसाई व अमोल शहा या दोघांना आर्थिक गुन्हे पथकाने जानेवारी २०१७च्या पहिल्या आठवड्यात अटक केली. इ.स. २००९ ते २०१६ या सात वर्षांत या आरोपींनी पुण्यातील सुमारे तीनशे नागरिकांची साडेदहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

परदेशात पळून गेलेला मुख्य आरोपी राजेश दिनकर कांबळे आणि त्याची फरार झालेली पत्‍नी विद्या राजेश कांबळे यांचा शोध घेण्यात येत आहे.