"हरि वामन लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीचौकट व्यक्ती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|स्थापत्य पदविकाधारक आणि बांधकाम व्यावसायिक हरिभाऊ धुडिराज लिमये}}

{{माहितीचौकट व्यक्ती
{{माहितीचौकट व्यक्ती
|चित्र =
|चित्र =

१९:०३, ३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

हरि वामन लिमये
शिक्षण M.A, LL.B

हरि वामन लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये (जन्म : पुणे, २६ एप्रिल, इ.स. १९२७; - मृत्यू : पुणे, जानेवारी १, २०१७) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भागीदार आणि मसाजतज्ज्ञ होते. समाजवादी चळवळीचा संस्कार, महात्मा गांधी, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी यांचा त्यांचावर प्रभाव होता. इंग्रज सरकारच्या अत्याचार आणि दडपशाहीला पुण्यात निरपराध नागरिक आणि स्त्रिया बळी पडल्या होत्या. अवघ्या १६ वर्षांच्या हरिभाऊंच्या मनात याबद्दल संतापाची आग धगधगत होती. त्यांच्याहून वयाने थोड्या मोठ्या तरुणांनी छावणी परिसरातील कॅपिटल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट करण्याचे ठरवले. त्यांना हरिभाऊंनी साथ दिली. ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी तेथे मोठय़ा संख्येने सिनेमा बघायला येत असत. त्यावेळी पोलीस समोर येताच त्यांनी बॉम्बच्या रसायनाची बाटली खिशात घातली होती. ती खिशातच सांडली आणि मांडी भाजून निघाली तरी सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी पोलिसी हिसका दाखवूनही तोंडातून अवाक्षरही काढले नाही.

चरित्र

वामन लक्ष्मण लिमये व सरस्वती वामन लिमये यांच्या ३ मुले आणि ५ मुली अशा एकूण ८ अपत्यांपैकी हरिभाऊ हे ५वे अपत्य होय. अवघ्या १६ वर्षांच्या वयात ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी हरिभाऊ व त्यांच्याहून वयाने थोड्या मोठय़ा तरुणांनी पुणे शहरातल्या छावणी परिसरातील कॅपिटॉल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ४ ब्रिटिश अधिकारी व कर्मचारी मारले गेले. पोलिसी हिसका दाखवूनही सहकारी पकडले जातील म्हणून त्यांनी आपल्या सहकार्‍यांची नावे गुप्त ठेवली. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकिली करण्यास प्रारंभ केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांचे विनामोबदला वकीलपत्र घेऊन त्यांनी अनेकांची सुटका केली.[१]

साहित्य

लेखन

  • दारूबंदीची नशा - १९६७
  • कारागृहातील पथिक - १९८७
  • साने गुरुजी : आठवणीतील - १९९६
  • अमृतपुत्र - साने गुरुजी - १९९८
  • मृत्युदंड - एक फेरविचार - १९९९
  • डॉ. राम मनोहर लोहिया - बॅटल फॉर लिबर्टी अन्ड जस्टीस ( इग्रजी) - २००१
  • आम्ही जातो आमुच्या गावा - २००२
  • अच्युतराव पटवर्धन
  • द हिलिंग टच

प्रकाशक

  • चंद्रभागेच्या वाळवंटीं - १९८१
  • हिमालयाची शिखरे - १९८९

सामाजिक कार्य

चळवळी आणि कार्यकर्त्यांचे ते आधारवड होते. त्यांनी आपली बुद्धी, धन व जागा देऊन कार्यकर्त्यांना मुक्तहस्ते मदत केली. वंचितांसाठी काम करणार्‍या संस्थांना ते ठरावीक तारखेला न चुकता देणगीचा धनादेश पाठवत.

संदर्भ