"के.व्ही. कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: जनरल के.व्ही. कृष्णराव (१९२४-२०१६) हे भारताचे लष्करप्रमुख होते. त्... |
(काही फरक नाही)
|
०६:३३, २ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
जनरल के.व्ही. कृष्णराव (१९२४-२०१६) हे भारताचे लष्करप्रमुख होते. त्यांच्याच पुढाकाराने इ.स. एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता.
९ ऑगस्ट १९४२ रोजी ते लष्करात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रह्मदेश, ईशान्य भारत व बलुचिस्तान आघाडीवर त्यांनी शत्रूशी दोन हात केले.
१९४७मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी करणार्या पाकिस्तानविरोधातील युद्धातही त्यांनी भाग घेतला.
देशाच्या फाळणीनंतर पूर्व व पश्चिम पंजाबमध्ये उसळलेला हिंसाचाराचा वणवा शांत करण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले.
१९६५-६६ या काळात लडाखमध्ये एका ब्रिगेडचे, तर १९६९-७० या काळात जम्मू विभागातील पायदळाचे त्यांनी नेतृत्व केले.
१९७०-७२ या काळात नागालँड व मणिपूरमधील घुसखोरी हाणून पाडणाऱ्या पहाडी तुकडीचेही त्यांनी नेतृत्व केले. याच काळात १९७१च्या बांग्लादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणार्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांग्लादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
३० जानेवारी, १९१६ रोजी जनरल कृष्णराव यांचे नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
पुरस्कार आणि सन्मान
- काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातलेअस्तानाच्या काळात कृष्णराव यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल केले होते.
- लष्करी सेवेबद्दल त्यांना परमविशिषिष््ट सेवा मेडल मिळाले होते.