"संशयकल्लोळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत संशयकल्लोळ हे...
(काही फरक नाही)

१७:३५, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत संशयकल्लोळ हे एक विनोदी सदाबहार नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने मोठ्या दिमाखात केला.

या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये ’तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स’या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. जेव्हा ग्ण्धर्व नाटक कंपनीने हे नाटक करायचे ठरवले तेव्हा मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात पदे टाकण्यात आली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्करांचे शिष्योत्तम्तर होतेच, शिवाय ते एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते, त्यामुळेच संशयकल्लोळमधील सर्व पदे बहारदार झाली.

संशयकल्लोळचे कथानक

अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका थोडीफार खलनायकी स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे.

फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे.या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते, आणि नाटक, बघणार्‍याची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते.

नाटकातील पद्यरचना

बोलता बोलता गायचे आणि गाता गाता बोलायचे, हा देवल आणि किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचा आत्मा संशकल्लोळमध्येही राखला गेला आहे.

नाटकातील पदे

पदे गाणारे गायक-गायिका

नाटकात भूमिका केलेले आजवरचे नट-नट्या