"आनंदऋषीजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आचार्य आनंदऋषीजी (जन्म " चिंचोडी, पाथर्डी तालुका-अहमदनगर, २७ जुलै...
(काही फरक नाही)

००:१८, २८ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

आचार्य आनंदऋषीजी (जन्म " चिंचोडी, पाथर्डी तालुका-अहमदनगर, २७ जुलै, १९००-श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १८२२; मृत्यू : अहमदनगर, २८मार्च, इ.स. १९९२) यांचे नाव नेमीचंद होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंदजी गुगळे आणि आईचे नाव हुलसाबाई असे होते. उत्तमचंदजी हे त्यांच्या मोठ्या भावाचे नाव होते.

जैन संतपदाची दीक्षा

आनंदऋषीजी यांनी वयाच्या १३व्या वर्षी, ७ डिसेंबर १९१३ रोजी (मार्गशीर्ष शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दीक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.

पहिले प्रवचन

आनंदऋषीजींनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिकून १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले.

==जैन धर्म प्रचार==

आनंदऋषीजींनी पुढे रत्नऋषीजींसोबत जैन धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलिपूर येथील (संथारा व्रतपश्चात्‌) मॄतयूनंतर आनंदऋषीजींनी त्यांच्या गुरुशिवाय हिंगणघाट येथे पहिला चातुर्मास केला.

संस्थास्थापना

आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ रोजी तिलोक रत्‍न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डाची स्थापना केली.

आनंदऋषीजी यांना मिळालेले सन्मान

  • १९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधु संमेलनामध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचा प्रधान म्हणून घोषित करण्यात आले.
  • १३ मे १९६४ साली अजमेर येथे (फाल्गुन शुक्ल एकादशीला) झालेल्या समारंभात आनंदऋषीजींना श्रीमान संघाचे दुसरे आचार्य म्हणून जाहीर करण्यात आले.
  • आनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पूर्ण करून पुण्याला आल्यावर त्यांचा श्निवार वाडा येथे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला.
  • १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणून गैरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंडेशनची स्थापना झाली हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.
  • अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आहे.

मृत्यू

आनंदऋषीजीचा २८ मार्च १९९२ रोजी अहमदनगर येथे मॄत्यु झाला. तेथील आनंदऋषीजी हॉस्पिट्ल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आहे.