"शंकरराव मुजुमदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकरराव तथा शंकर बापूजी मुजुमदार (जन्म : इ.स. १८६२; मृत्यू : २८ नोव्ह...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:


शंकरराव मुजुमदार यांनी ’शाकुंतल’ आणि ’सौभद्र’ या नाटकांत भूमिका केल्या होत्या. नटांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी नटांना छपाईविषयक कामे शिकवली होती. शंकररावांनी ’रंगभूमि’ नावाचे मासिक सुरू केले होते. [[शेक्सपियर]]ची अनुवादित-रूपांतरित नाटके मराठी रंगभूमीवर आणण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी ’भारत नाट्य समाजा’ची स्थापना केली.
शंकरराव मुजुमदार यांनी ’शाकुंतल’ आणि ’सौभद्र’ या नाटकांत भूमिका केल्या होत्या. नटांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी नटांना छपाईविषयक कामे शिकवली होती. शंकररावांनी ’रंगभूमि’ नावाचे मासिक सुरू केले होते. [[शेक्सपियर]]ची अनुवादित-रूपांतरित नाटके मराठी रंगभूमीवर आणण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी ’भारत नाट्य समाजा’ची स्थापना केली.

==शं.बा. मुजुमदारांनी लिहिलेली पुस्तके==
* महाराष्ट्रीय नाटककार यांची चरित्रे
* अण्णासाहेब किर्लोस्कर (यांचे चरित्र)





१७:४७, १७ मे २०१५ ची आवृत्ती

शंकरराव तथा शंकर बापूजी मुजुमदार (जन्म : इ.स. १८६२; मृत्यू : २८ नोव्हेंबर, १९३८) हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे व्यवस्थापक, अभिनेते, मुद्रणतज्ज्ञ, संपादक आणि चरित्रलेखक होते.

शंकररावांना नाटकाचे फार वेड होते. पुण्यात राहत असल्याने तेथे होणार्‍या प्रत्येक नाटकाला शंकरराव हजर असत. रसिकतेने आणि तन्मयतेने नाटके पाहणार्‍या मुजुमदारांना नाटक मंडळीतील प्रत्येकाबद्दल आस्था आणि प्रेम वाटे.

नाटक कंपनीचे व्यवस्थापन

१३ फेब्रुवारी १९०१ रोजी झालेल्या भाऊराव कोल्हटकरांच्या निधनानंतर किर्लोस्कर नाटक कंपनीची जबाबदारी अभिनेते नानासाहेब जोगळेकर व व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांनी सांभाळली. दुर्दैवाने १७ नोव्हेंबर १९११ रोजी नानासाहेब अचानक निधन पावले. त्यांच्या मृत्यूनंतर कंपनीच्या मालकीचा वाद निर्माण झाला. कंपनीचे जुने जाणते व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांना कंपनीची मालकी हवी होती. पण त्यांचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला. शेवटी गोविंदराव टेंबे यांची सूचना मान्य होऊन १९११ च्या डिसेंबर महिन्यात कंपनीची मालकी बालगंधर्व, गणपतराव बोडस आणि शंकरराव मुजुमदार या तिघांकडे आली.

शंकरराव मुजुमदार यांनी ’शाकुंतल’ आणि ’सौभद्र’ या नाटकांत भूमिका केल्या होत्या. नटांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी नटांना छपाईविषयक कामे शिकवली होती. शंकररावांनी ’रंगभूमि’ नावाचे मासिक सुरू केले होते. शेक्सपियरची अनुवादित-रूपांतरित नाटके मराठी रंगभूमीवर आणण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी ’भारत नाट्य समाजा’ची स्थापना केली.

शं.बा. मुजुमदारांनी लिहिलेली पुस्तके

  • महाराष्ट्रीय नाटककार यांची चरित्रे
  • अण्णासाहेब किर्लोस्कर (यांचे चरित्र)


(अपूर्ण)

सन्मान

नाटकमंडळ्यांच्या सहवासात हयात घालवून अभिनेत्यांची चरित्रे लिहिणार्‍या शंकरराव बापूजी मुजुमदारांना, पुण्यात १९१६ साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला.