"अनुराधा वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अनुराधा श्रीपाद वैद्य या एक मराठी लेखिका आहेत. ==अनुराधा वैद्य या... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अनुराधा |
अनुराधा शशिकांत वैद्य या एक मराठी लेखिका आहेत. |
||
त्यांचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात हिरीरीने काम केले होते. घरात एकूण ७ भावंडे, म्हणजे २ भाऊ आणि ५ बहिणी होत्या. शिक्षण संपल्यासंपल्या अनुराधा यांचे लग्न डॉ. गणपतराव वैद्य आणि इंदिराबाई वैद्य यांचा मुलगा शशिकांत वैद्य यांच्याशी झाले आणि मग त्या लग्न, संसार, शेती-भाती, गुरे-ढोरे, प्राणी आणि शिवणकला, पाककला, गायन इत्यादींत रमल्या. शाळा-कॉलेजात खरे तर लेखनाची सुरुवात होते, पण अनुराधा वैद्यांची लिखाणाची सुरुवात वयाच्या ३५व्या वर्षी झाली. सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद, जळगाव, पुणे आकाशवाणीसाठी लेखन करायला सुरुवात केली. |
|||
वैद्य कुटुंबाचा औरंगाबादच्या खडकेश्वर भागात एक एकरात बंगला होता. तिथे बंगल्यात वैद्यमंडळी हौसेने शेती करत असत. मग त्यांनी बाग तयार केली. त्या दरम्यान शेळी, कुत्री, मांजरी असे विविध प्रकारचे प्राणी पाळले. या सर्व प्राण्यांचे करताना अनुराधा वैद्यांना लिहायला, वाचायला वेळ मिळत नव्हता. पण त्याचवेळी त्यांनी अमरेंद्र मासिकासाठी `वनवास हा सुखाचा’ ही कथा लिहिली. त्यांच्या प्राणी पाळण्यावरच ती कथा बेतलेली होती. ती कथा छापून आल्यावर लोकांना ती कथा आवडली, आणि त्या कथेला मिळालेला प्रतिसाद पाहूनच मग अनुराधा वैद्यांच्या लेखनाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. |
|||
==नियतकालिकांतले लेखन== |
|||
अनुराधा वैद्य यांनी लेखनाची सुरुवात विनोदी कथांनी केली. `मोहिनी`, `श्यामसुंदर’, `माहेर’, `जत्रा’ अशा मासिकांमध्ये अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. विनोदी लेखनासाठी राज्य शासनाचा पहिला पुरस्कार त्यांना `अजुनी खुळा हा’ या विनोदी कथासंग्रहासाठी मिळाला. त्यानंतर मात्र खूप विनोदी लेखन केल्यानंतर मग त्या गंभीर लिखाणही करू लागल्या. मग कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका लेखनास सुरुवात झाली. चौफुला, श्वानप्रस्थ या कादंबर्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. `माध्यम’ कादंबरीला पहिला ना. सी .फडके पुरस्कार मिळाला. कुत्रे, मांजरे, ससे, हरिण, पोपट काही प्राणी त्यांच्या घरातच होते. या अनेकविध पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे त्यांचे करता करता अनुराधा वैद्य यांनी स्वतःच्या अनुभवावर `श्वानप्रस्थ’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी विशेष गाजली. |
|||
==अनुराधा वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके (४३हून अधिक)== |
==अनुराधा वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके (४३हून अधिक)== |
||
* अजुनी खुळा हा (कथासंग्रह) |
* अजुनी खुळा हा (विनोदी कथासंग्रह) |
||
* अंतर |
* अंतर (कथासंग्रह) |
||
* अस्तित्वरेषा |
* अस्तित्वरेषा (कथासंग्रह) |
||
* आजन्म |
* आजन्म |
||
* उजेडाचं दार |
|||
* उजेडाचंदार |
|||
* काजळ ( |
* काजळ (कथासंग्रह) |
||
* गाारूड |
* गाारूड |
||
* गुंफण (ना.घ. देशपांडे यांची याच नावाची एक कादंबरी आहे.) |
* गुंफण (ना.घ. देशपांडे यांची याच नावाची एक कादंबरी आहे.) |
||
ओळ १५: | ओळ २१: | ||
* पंख |
* पंख |
||
* प्रवाह |
* प्रवाह |
||
* बाकी क्षेम ( |
* बाकी क्षेम (कथासंग्रह) |
||
* भूमिका |
* भूमिका |
||
* मन जाई दिगंतरा |
* मन जाई दिगंतरा |
||
ओळ २१: | ओळ २७: | ||
* माझी चिंध्यांची बाहुली (काव्यांबरी) |
* माझी चिंध्यांची बाहुली (काव्यांबरी) |
||
* माध्यम (हिंदी कादंबरी) |
* माध्यम (हिंदी कादंबरी) |
||
* श्वानप्रस्थ |
* श्वानप्रस्थ (कादंबरी) |
||
* सुमी आणि सोन्या (बालसाहित्य) |
* सुमी आणि सोन्या (बालसाहित्य) |
||
* क्षणकाल (कादंबरी) |
* क्षणकाल (कादंबरी) |
२२:३७, २२ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
अनुराधा शशिकांत वैद्य या एक मराठी लेखिका आहेत.
त्यांचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात हिरीरीने काम केले होते. घरात एकूण ७ भावंडे, म्हणजे २ भाऊ आणि ५ बहिणी होत्या. शिक्षण संपल्यासंपल्या अनुराधा यांचे लग्न डॉ. गणपतराव वैद्य आणि इंदिराबाई वैद्य यांचा मुलगा शशिकांत वैद्य यांच्याशी झाले आणि मग त्या लग्न, संसार, शेती-भाती, गुरे-ढोरे, प्राणी आणि शिवणकला, पाककला, गायन इत्यादींत रमल्या. शाळा-कॉलेजात खरे तर लेखनाची सुरुवात होते, पण अनुराधा वैद्यांची लिखाणाची सुरुवात वयाच्या ३५व्या वर्षी झाली. सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद, जळगाव, पुणे आकाशवाणीसाठी लेखन करायला सुरुवात केली.
वैद्य कुटुंबाचा औरंगाबादच्या खडकेश्वर भागात एक एकरात बंगला होता. तिथे बंगल्यात वैद्यमंडळी हौसेने शेती करत असत. मग त्यांनी बाग तयार केली. त्या दरम्यान शेळी, कुत्री, मांजरी असे विविध प्रकारचे प्राणी पाळले. या सर्व प्राण्यांचे करताना अनुराधा वैद्यांना लिहायला, वाचायला वेळ मिळत नव्हता. पण त्याचवेळी त्यांनी अमरेंद्र मासिकासाठी `वनवास हा सुखाचा’ ही कथा लिहिली. त्यांच्या प्राणी पाळण्यावरच ती कथा बेतलेली होती. ती कथा छापून आल्यावर लोकांना ती कथा आवडली, आणि त्या कथेला मिळालेला प्रतिसाद पाहूनच मग अनुराधा वैद्यांच्या लेखनाला खर्या अर्थाने सुरुवात झाली.
नियतकालिकांतले लेखन
अनुराधा वैद्य यांनी लेखनाची सुरुवात विनोदी कथांनी केली. `मोहिनी`, `श्यामसुंदर’, `माहेर’, `जत्रा’ अशा मासिकांमध्ये अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. विनोदी लेखनासाठी राज्य शासनाचा पहिला पुरस्कार त्यांना `अजुनी खुळा हा’ या विनोदी कथासंग्रहासाठी मिळाला. त्यानंतर मात्र खूप विनोदी लेखन केल्यानंतर मग त्या गंभीर लिखाणही करू लागल्या. मग कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका लेखनास सुरुवात झाली. चौफुला, श्वानप्रस्थ या कादंबर्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. `माध्यम’ कादंबरीला पहिला ना. सी .फडके पुरस्कार मिळाला. कुत्रे, मांजरे, ससे, हरिण, पोपट काही प्राणी त्यांच्या घरातच होते. या अनेकविध पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे त्यांचे करता करता अनुराधा वैद्य यांनी स्वतःच्या अनुभवावर `श्वानप्रस्थ’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी विशेष गाजली.
अनुराधा वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके (४३हून अधिक)
- अजुनी खुळा हा (विनोदी कथासंग्रह)
- अंतर (कथासंग्रह)
- अस्तित्वरेषा (कथासंग्रह)
- आजन्म
- उजेडाचं दार
- काजळ (कथासंग्रह)
- गाारूड
- गुंफण (ना.घ. देशपांडे यांची याच नावाची एक कादंबरी आहे.)
- चौफुला (कादंबरी)
- निमिष
- पंख
- प्रवाह
- बाकी क्षेम (कथासंग्रह)
- भूमिका
- मन जाई दिगंतरा
- मनुष्यहाट
- माझी चिंध्यांची बाहुली (काव्यांबरी)
- माध्यम (हिंदी कादंबरी)
- श्वानप्रस्थ (कादंबरी)
- सुमी आणि सोन्या (बालसाहित्य)
- क्षणकाल (कादंबरी)
(अपूर्ण)