"आत्माराम भैरव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. आ.भ. जोशी (जन्म इ.स. १९१६; मृत्यू : इ.स. २०१०) हे एक भारतीय कृषिशास्त...
(काही फरक नाही)

१२:२९, १३ मार्च २०१३ ची आवृत्ती

डॉ. आ.भ. जोशी (जन्म इ.स. १९१६; मृत्यू : इ.स. २०१०) हे एक भारतीय कृषिशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म जबलपूर येथे झाला व शिक्षण रायपूर, नागपूर, दिल्ली व केंब्रिजमध्ये झाले. पेशीविज्ञान (Cytology) हा त्यांचा अभ्यासाचा खास विषय होता.

१९३७ पासून १९७७ पर्यंत इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च(दिल्ली) या संस्थेत असलेले डॉ. आ.भ. जोशी १९६६ साली त्या संस्थेचे उपमहासंचालक झाले.त्याच काळादरम्यान, म्हणजे १९६५-६६ व १९७२-७७ या काळात ते इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये संचालक होते. १९७७-८० या काळात ते राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते.

भारतात १९७०च्या दशकात झालेल्या हरितक्रांतीत डॉ. आ.भ. जोशी यांचा महत्त्वाचा वाटा होता. जागतिक अन्न संघटनेच्या विनंतीवरून इंडोनेशिया, पेरू, नेदरलँड्स, बांग्लादेश, टांझानिया इत्यादी देशांचे धान्योत्पादन वाढविण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

भारतभरात कोणती पिके घ्यायची, एखाद्या पिकाची कोणती जात कोठे घ्यायची हे ठरविणाऱ्या राष्ट्रीय समन्वयक समितीचे ते अध्यक्ष होते. पीक उत्पादन वाढावे, त्यांची किंमतही कमी राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पिकांना होणारी रोगराई कमी करण्यासाठी औषध फवारणी करण्याऐवजी त्यांनी पिकातच तशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल, अशी योजना केली. त्यामुळे पिकावर पडणारी कीड २० ते ३० टक्क्यांवरून दोन ते तीन टक्क्यांवर आली. त्यांनी भारतभर शेतकऱ्यांमध्ये याचा प्रचार-प्रसार केला. हे पाहून इतर शास्त्रज्ञांनीही याबाबत संशोधन सुरू केले. डॉ. जोशींच्या सल्ल्यामुळे गहू, मका, वरी, तांदूळ, कापूस, एरंडी, शेंगा, सोयाबिन, ताग, डाळी, तीळ, जनावरांसाठी चारा इत्यादी पिकांच्या उत्पादकतेत वाढ झाली.

जगात पिकांच्या मूळ जातींपासून नवनवीन जाती निर्माण होत आहेत. नवीन जातीत काही दोष निर्माण झाले, तर पुन्हा मूळ जातीचे संशोधन करून त्यांच्यातून हे दोष काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी पिकांची सगळी मूळ वाणे जतन केली पाहिजेत, हा डॉ.जोशींचा सल्ला जागतिक अन्न संघटेनेने मान्य केला व तशी यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली. हे काम डॉ.जोशींनी पूर्ण केले. जिनिव्हातील जागतिक अन्न संघटनेची सल्लागार समिती जिनिव्हातूनच शेतीसंदर्भात सल्ले देण्याचे काम करीत असे. पण शेतकऱ्याला त्याच्या शेतावर जाऊन सल्ला दिला पाहिजे, असे डॉ.जोशींनी त्यांना सुचविले.

२०१० मध्ये वयाच्या ९४व्या वर्षी डॉ.जोशी यांचे पुणे येथे निधन झाले.